आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद कन्या प्रशालेतील दहावीच्या वर्गमैत्रीणी तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा भेटल्या.यावेळी जिवलग वर्ग मैत्रिणींनी त्यांच्या शिक्षकांसह जुन्या आठवणींना उजाळा दिला. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा सन १९९६ - ९७ च्या दहावीच्या बॅच चा स्नेहमेळावा झाला. या वेळी २५ वर्ग मैत्रिणींची उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी त्या वेळच्या शिक्षकांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते.
या स्नेह मेळाव्यासाठी अमृता मलबा, शैलजा गवळी, गौरी देशमुख, अरुंधती कुलकर्णी या स्थानिक वर्गमैत्रिणींनी पुढाकार घेतला होता. यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मैत्रिणींनी आठवणींना उजाळा दिला तर शिक्षकांनी विद्यार्थ्यीनींचे कौतुक केले. शेवटच्या सत्रात संगित मैफिलीचा आनंद घेतला. यावेळी चौधरी, आंबेकर, राऊत, पारधे, आचलेरकर, जळके आदी शिक्षिकांची उपस्थित होती. सुत्रसंचालन शैलजा गवळी, स्वाती देशमुख व शुभांगी कदम यांनी तर आभार अमृता मलबा यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.