आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाजार समितीचे सचिवांना अतिक्रमणधारकांनी धमकी दिल्याची घटना घडली असून याच्या निषेधार्थ आडत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच अतिक्रमण काढण्याचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण वाढत चालले आहे. हे अतिक्रमणधारक अवैधरीत्या धंदे करत आहेत. याचा नाहक त्रास होत आहे. यामुळे अनेक दिवसांपासून परिसरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.
त्यामुळे सचिव दत्तात्रय वाघ यांनी अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे संतापलेल्या अतिक्रमण धारकांनी जागा नावावर कर अन्यथा डोक्यात गोळी घालून ठार करतो, अशी धमकी बाजार समितीच्या सचिवांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी सकाळ आडत व इतर दुकाने बंद ठेवली. त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
बाजार समितीच्या आवारात अतिक्रमण केलेल्या काही गुन्हेगार क्षेत्रातील लोकांनी बाजार आवारात व्यवसाय करत असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात आणलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या चोऱ्या केलेल्या आहेत. अनेक वेळा व्यापाऱ्यांच्या दुकानावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या व्यक्तिंना मारहान करून खून केलेले आहे.
सद्या बाजार समिती आवारातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका आहे. यामुळे अनेक व्यापारी दुकान बंद करण्याच्या मार्गावर आहेत. अनेक व्यापाऱ्यांचे व्यवसाय लहान असून लहान मोठ्या चोरांनी उध्वस्त होत आहेत. अनेकवेळा जागा सोडण्यासाठी धमकी दिली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.