आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारांकन लावून वाटप करण्यात आलेला पिक विमा अमान्य असून तातडीने सुधारित पद्धतीने विमा वाटप करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. सचिन ओम्बासे भारतीय कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना दिला आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे तसेच कृषी विभागातील व विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शक सुचनेतील मुद्दा क्र. २१.५.१० नुसार मधील ५०:५० भारांकन लावून निश्चित केलेली नुकसान भरपाई जिल्हास्तरीय समितीस मान्य नसून सुधारीत नुकसान भरपाई निश्चिती करुन त्यानुसार वाटप करावे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना यावर्षीचा पिक विमा असमतोल पद्धतीने विक्रीत केला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश दिले आहेत. दि. ३ व १४ डिसेंबर २०२२ रोजीच्या बैठकांमध्ये झालेल्या आदेशाप्रमाणे कारवाई करणे. तसेच देण्यात आलेले आदेश व इतिवृत्तांचा बाबत केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल सादर करणे, विमा कंपनीकडील पंचनाम्याची प्रती ७ दिवसांच्या आत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करून तसा अहवाल जिल्हास्तरीय समितीस सादर करावा.
पुर्वसुचना दिलेल्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना त्या कालावधीतील त्या महसूल मंडळतील नुकसानीची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा भरपाई तात्काळ वितरीत करावी. जिल्हयातील विमा हप्ता, प्राप्त झालेली रक्कम व त्यानुसार वाटप होणारी रक्कम याबाबतची माहिती दोन दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.