आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सलग दहा दिवस (६ ते १६ एप्रिल) जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण येथील सामाजिक न्याय भवनामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मिनिट्रॅक्टर आदी योजनेच्या लाभार्थांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात येईल.
९ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनात ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना जनजागृती संदर्भात मेळावा तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.१० एप्रिल रोजी समता दूतांमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्यातून प्रबोधन करण्यात येईल.११ एप्रिल रोजी कृषी महाविद्यालय, गडपाटी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होईल.
१२ एप्रिल रोजी मार्जिन मनी कार्यक्रमाची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये अनु.जाती व नवबौध्द घटकातील वस्तीमध्ये समता दुतांमार्फत संविधान जनजागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
१४ एप्रिलला जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून अभिवादन करण्याचा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे घेण्यात येणार आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल अशी माहिती देण्यात आली.
आज वक्तृत्व,निबंध व लघुनाट्य स्पर्धाचे आयोजन
गुरूवारी श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ एप्रिल रोजी महिला मेळावा होईल.
१६ एप्रिल रोजी अनु.जाती व नवबौध्द घटकातील वस्तीमध्ये जाऊन स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचा लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त अरावत यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.