आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल:वातावरण बदलाने तापमान 31 अंशांवर, सर्दी-खोकला, साथीचे आजार वाढले‎

धाराशिव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांपासून वातावरणात बदल‎ झाला असून जिल्ह्यातील काही‎ भागात हलका पाऊसही झाला आहे.‎ ढगाळ वातावरण कायम असल्याने‎ मागील आठवड्यात ३८ अंशांवर‎ गेलेले कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत‎ खाली घसरले आहे. कधी उकाडा‎ तर कधी हिवाळ्यासारखी थंडी‎ जाणवत आहे. यामुळे लहान‎ मुलांसह वयोवृद्ध सर्दी, खोकल्यासह‎ विषाणुजन्य आजारांना बळी पडत‎ आहेत. अनेकांना उलटी, मळमळ‎ होऊन डोके गरगरत आहेत.‎ यावर्षी फेब्रुवारीत उन्हाळ्याच्या‎ सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता‎ जा‌णवली होती. २७ फेब्रुवारीला‎ किमान पारा २३ तर कमाल पारा ३८‎ अंशांवर गेला होता. त्यामुळे‎ उन्हाळ्याचे तीन महिने कडक‎ जाणार, असे वाटत होते. मात्र, मार्च‎ महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून‎ वातावरणात बदल झाला.

ढगाळ‎ वातावरणासह काही भागात हलका‎ पाऊस झाल्याने हवेत थंडावा निर्माण‎ झाला आहे. परिणामी, उन्हाची‎ तीव्रता कमी झाली असून किमान‎ तापमान १८ ते २१ तर कमाल तापमान‎ ३१ अंशांवर स्थिरावले आहे. तब्बल‎ ७ अंशांनी पारा घसरल्याने‎ वातावरणात थंडी वाढली असून‎ हवेचा वेग अधिक आहे. यामुळे थंड‎ पेयांच्या दुकानातील गर्दी काही‎ प्रमाणात कमी झाली आहे. रात्री‎ गारवा जाणवत असून दिवसभर‎ ढगाळ वातावरणाने दमटपणा वाढला‎ आहे. होळी, धुलिवंदपासून‎ वातावरणात थंडावा जाणवत आहे.‎ रात्री थंडी व दिवसा उकाड्यामुळे‎ मोठ्यांसह लहान मुलांना सर्दी,‎ खोकल्याचा त्रास वाढला आहे.‎ सध्या रब्बी हंगामातील ज्वारी सोडून‎ हरभरा व इतर पिकांची काढणी झाली‎ आहे. त्यामुळे पिकांना ढगाळ‎ वातावरणाचा फटका बसणार नाही.‎ मात्र, हलका पाऊस झाल्यास‎ काढणीला आलेल्या ज्वारीचे‎ नुकसान होण्याची शक्यता नाकारता‎ येत नाही.‎

हलक्या पावसाची शक्यता‎
धूलिवंदनपासून वातावरणात बदल झाला असून‎ अधूनमधुन ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.‎ फेब्रुवारीत जाणवणारी उन्हाची तीव्रता मार्चच्या‎ दुसऱ्या आठवड्यात कमी झाल्याने किमान व‎ कमाल तापमान घटले आहे. आगामी काही‎ दिवसांत ढगाळ वातावरण राहणार असून हलका‎ पाऊस पडण्याची शक्यता आहे.‎ -ए. के. भड, तापमान निरीक्षक.‎

बातम्या आणखी आहेत...