आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी उत्पन्न बाजार समिती अतिक्रमणाच्या वादात व्यापाऱ्यांनी उडी घेतली असून समिती आवारातील व्यापारी परवाना नूतनीकरण न करण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे बाजार समितीचा लाखोंचा कर बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर समिती प्रशासन काय भूमिका घेते याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे कार्यक्षेत्र २७ एकर पेक्षा जास्तीचे असून तेथे काही विशिष्ठ समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे.
अतिक्रमण केलेल्या लोकांकडून व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे त्याचा व्यापारावर दुष्परिणाम होऊन व्यापार दिवसेंदिवस खालावत आहे. अतिक्रमण केलेल्या लोकांकडून वारंवार शेतकरी, वर्गाला येणाऱ्या ग्राहकाला त्रास होत आहे.अतिक्रमण धारकांकडून नेहमी शेतकऱ्यांच्या चोऱ्या करणे, बाजार आवारात दारू निर्मिती विक्री करणे अशा बाबी होत असल्याने व्यापारी वर्ग धास्तावला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी दुसरीकडे व्यापार सुरू केलेला आहे.
नूतनीकरण न केल्यास ४० लाख कर बुडण्याची शक्यता
बाजार समिती येथे १००३ व्यापारी व २०५ हमाल आहेत. बाजार समितीचा परवाना नूतनीकरण सुरू होऊन एक हप्ता झाला आहे, तरी पण एक परवाना नूतनीकरण झाले नाही. अतिक्रमण काढता का नाही, काढले नाही तर कोणीही परवाना नूतनीकरण करणार नाही असा पवित्रा घेतल्याने बाजार समितीचे अस्तित्वात धोक्यात येण्याची शक्यता आहे.नूतनीकरणातून बाजार समितीला प्रतिवर्षी ४० लाखांच्या आसपास कर मिळतो, बाजार समितीचा लाखोंचा कर बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.