आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी समस्या:उमरग्यात अतिक्रमणामुळे वाहतूक‎ कोंडीसोबतच अपघाताचा धोका‎

उमरगा‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आणि‎ शासकीय कार्यालय प्रवेशद्वार परिसरात‎ बेकायदा पद्धतीने अतिक्रमणे करणाऱ्या‎ व्यावसायिकांवर कारवाई करण्याची‎ गरज निर्माण झाली आहे. शहरातील‎ विविध भागासह मुख्य रस्त्यांवर‎ अनधिकृत हातगाडी,फेरीवाले,‎ स्टॉलधारक यांच्या अतिक्रमणाचा‎ विळखा पडला आहे. शासकीय‎ कार्यालयांची प्रवेशद्वारे‎ अतिक्रमणधारकांनी गिळकृंत केल्याने‎ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना वाट‎ शोधून जावे लागते. बेकायदा‎ अतिक्रमणांवर प्रशासन कधी कारवाई‎ करणार, अशी सर्व सामान्य नागरिकांतून‎ मागणी केली जात आहे.‎ शहराच्या मध्यभागातून गेलेल्या मुख्य‎ रस्त्यांच्या दुतर्फा अन परिसरात बेकायदा‎ व्यावसायिकांमुळे मोठ्या प्रमाणात‎ वाहतुकीची कोंडी होत आहे. दिवसातून‎ एक-दोन अपघात होत आहेत. मध्यंतरी‎ तत्कालीन पोलीस निरीक्षक, पालिका‎ प्रशासनाने अतिक्रमणांवर धडक‎ कारवाई सुरू केली होती. शिवाय‎ रस्त्याच्या लगत मार्किंग करून दुचाकी व‎ वाहन थांबे करण्यात आली होती, मात्र‎ आठवडाभरातच अतिक्रमण मोहीम‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ थंडावल्याने जैसे थे स्थिती पुन्हां निर्माण‎ झाली आहे.

कारवाईत सातत्य असणे‎ गरजचे असताना या बाबत प्रशासनाला‎ विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळत‎ आहे. शहराच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा‎ व्यावसायिक, स्टॉलधारक,हॉटेल‎ व्यावसायिक, ज्यूस, फळ व‎ हातगाडीवाल्यांनी अतिक्रमणे केली‎ असल्याने रस्त्यांवर पादचारी यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चालणे ही अवघड झाले आहे.‎ शहरातील मुख्य रस्त्यावरच दैनंदिन‎ भाजीपाला विक्री करण्यात येत‎ असल्याने वाहतूक खोळंबा होतोय.‎ पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुख्य‎ रस्ता पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात‎ सापडलेला आहे. शहरात बहुतांश‎ अतिक्रमणांवर राजकीय पदाधिकाऱ्यांचा‎ वरदहस्त असल्याने ही अतिक्रमणे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वारंवार उभी राहत आहेत. याचा त्रास‎ मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन‎ करावा लागत आहे. दरम्यान,‎ पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने‎ अनाधिकृत व्यावसायिकांवर कारवाई‎ करण्याची मागणी नागरिकांतून केली‎ जात आहे. रस्त्यावर मोठ्या‎ प्रमाणावर हातगाड्या,भाजीपाला विक्रेते‎ असतात.‎

शहरात पार्किंग, भाजीमंडईला जागाच नाही‎
महामार्गालगत वसलेल्या शहरातस्वतंत्र भाजी मंडई साठी जागा नाही. मुख्य‎ बाजारपेठ, आरोग्यनगरी यासह राष्ट्रीय महामार्गाच्या आसपास वहानाच्या‎ पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहनाची बेशिस्त‎ पार्किंग अडचणीची ठरत आहे. ॲटो थांबे, अप्रशिक्षित चालक, विना परवाना‎ वाहन, परवाना नेसलेले अन सुसाट धावणारे दुचाकी यांच्यामुळे वाहतूक कोंडी होत‎ असल्याने समस्यांवर कायम स्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे.‎

कारवाईत सातत्य आवश्यक‎
याबाबत व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष‎ नितीन होळे म्हणाले की, पालिका‎ प्रशासनाने काही वर्षापूर्वी राष्ट्रीय‎ महामार्गांवरील वाढतेअतिक्रमण‎ हटविण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.‎ सीमारेषा अखून दिली होती. त्याच्या‎ बाहेर आढळल्यास कारवाई करण्यात‎ येणार असल्याची सुचना देण्यात‎ आल्याने काही दिवस महामार्गाने मोकळा‎ श्वास घेतला, मात्र पुन्हां जैसे थे‎ स्थितीमुळे वाहतूक कोंडी कायम आहे.‎ पालिका अन पोलिस प्रशासनाकडून‎ कारवाईत सातत्य ठेवल्यास शहराचे‎ वैभव खुलून दिसणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...