आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष:जनजागृती, सतर्कतेमुळे जिल्ह्याचा माता मृत्यूदर एका वर्षात निम्म्याने घटला‎

बाळासाहेब माने | धाराशिव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागरुक नागरिक अन् आरोग्य विभागाच्या‎ सतर्कतेने चार वर्षांपासून जिल्ह्यातील‎ मातांचा मृत्युदर घटत आहे. २०२१-२२ मध्ये‎ २०.७ टक्क्यांवर असणारा हा दर २०२२-२३‎ (फेब्रुवारीपर्यंत) मध्ये १० टक्क्यांवर आला‎ आहे.‎ देशात काही वर्षांपासून माता मृत्यू दरात‎ (एमएमआर) घट होत आहे. भारतीय‎ महानिबंधकाने माता मृत्यूदरासंदर्भात‎ दिलेल्या माहितीत भारताच्या मातामृत्यू‎ दरामध्ये १० अंकांची घट झाली आहे.‎ केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या तीन‎ राज्यांनी एमएमआरमध्ये १५ टक्क्यांपेक्षा‎ जास्त घट दर्शवली आहे.

महाराष्ट्रात‎ धाराशिव जिल्ह्याने गतवर्षीच्या तुलनेत १०‎ टक्क्यांनी घट दर्शवली आहे. माता व‎ बालमृत्यू होऊ नये म्हणून आरोग्य विभाग‎ प्रयत्नरत असला तरी महिलांनीही‎ गरोदरपणात काळजी घेणे गरजेचे आहे.‎ प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्राव होणे, उच्च‎ रक्तदाब व झटके येणे, सिझर झाल्यानंतर‎ होणाऱ्या गुंतागुंतीमुळे अधिक मातांचा मृत्यू‎ होतो. गरोदरपणात किमान चार वेळा‎ रुग्णालयात तपासणी करणे आवश्यक‎ आहे. यामध्ये वजन वाढ, रक्तदाब, रक्त‎ तपासणी, लघवी तपासणी व किमान तीन‎ सोनोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे.‎ आई होणे हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील‎ सर्वात आनंददायी क्षण असतो. परंतु,‎ अनेक गर्भवती माता प्रकृतीकडे दुर्लक्ष‎ करतात. नियमित तपासणी व त्रास सुरू‎ झाल्यानंतर वेळेत रुग्णालयात दाखल‎ करण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी,‎ अनेक महिलांचा मृत्यू ओढवतो. हा धोका‎ टाळण्यासाठी गर्भधारणा झाल्यावर‎ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे‎ तपासणी करावी. धाराशिव जिल्ह्यात‎ वर्षभरात जवळपास २५ हजार प्रसूती‎ होतात. राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात माता‎ मृत्यूचे प्रमाण कमी आहे.‎

गर्भरपणात लोह, फॉलिक अॅसिड, कॅल्शियमचे सेवन करावे
एखाद्या मातेचा मृत्यू झाल्यास माता मृत्यू‎ अन्वेषण समितीकडून याची चौकशी केली‎ जाते. मृत्यूची कारणे शोधून त्यावर‎ उपाययोजना केल्या जातात. परंतु, मृत्यू‎ होऊच नये, याची काळजी घेणे आवश्यक‎ आहे. महिलांनी गरोदरपणात लोह व‎ फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियमच्या‎ गोळ्यांचे सेवन करावे. आहार, व्यायामासह‎ वेळेनुसार आरोग्य तपासणी करून‎ डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करणे‎ आवश्यक आहे. यामुळे गर्भातील बाळाची‎ स्थिती व गर्भाची अवस्था समजते.‎

गरोदरपणात किमान चारदा‎ तपासणी आवश्यक
महिलांनी गरोदरपणात किमान चार वेळा‎ आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.‎ यामध्ये वजनवाढ, रक्तदाबासह किमान‎ तीन सोनोग्राफी करणे गरजेचे आहे.‎ प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्राव होणे, उच्च‎ रक्तदाब व सिझर झाल्यानंतर होणाऱ्या‎ गुंतागुंतीमुळे अधिक मातांचा मृत्यू होतो.‎- डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा प्रजनन‎ व बाल आरोग्य अधिकारी.‎

बातम्या आणखी आहेत...