आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी:दरात घसरण; शेतकरी काढणीस‎ धजावेना, कांदा रानामध्येच पडून‎

समाधान डोके । ईट23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक दिवसांपासून कांद्याचे दर‎ गडगडलेले आहेत. यामुळे कांदा‎ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा‎ निर्माण झाली आहे. अनेक शेतात कांदा‎ काढणीअभावी पडून आहे.‎ अतिवृष्टीमध्ये सपाटून नुकसान‎ झाल्यानंतर शेतकऱ्यांची पूर्ण भिस्त‎ कांद्यावरच होती. परंतु, आता दर‎ घसरल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला‎ आहे.‎ मागील काही दिवसांपासून कांद्याचे‎ भाव कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा‎ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला‎ आहे. जीवापाड कष्ट करून पिकवलेला‎ कांदा कवडीमोल भावात विकला जात‎ असल्याने बळीराजाला अश्रू अनावर‎ होत आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या‎ मालाला योग्य बाजारभाव मिळत‎ नसल्याने आता शेतकऱ्यांची अवस्था‎ दयनीय झाली आहे. पिकासाठी केलेला‎ खर्चही शेतीमालातून येत नसल्याने आता‎ शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा वाढत जात‎ आहे. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल‎ भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त‎ झाले आहेत. उत्पादनाचा खर्चही निघत‎ नसल्याने कांदे फेकून देण्याची वेळ‎ शेतकऱ्यांवर येणार की काय, अशी भीती‎ परिसरात व्यक्त केली जात आहे. सध्या‎ ईट परिसरात अनेक शेतकऱ्यांनी फडातून‎ कांदा बाहेर काढलेला नाही. कांदा शेतात‎ तसाच काढणीअभावी पडून आहे.‎ अनेकांनी कांदा तसाच उपटून शेतात ढिग‎ लावून ठेवला आहे. शेतकऱ्यांना कांदा‎ बाजूला काढण्यासाठी धीरही होत नाही.‎

यामुळे तसाच कांदा पडून आहे. कांदा‎ काढून बाजूला काढणे, तेथून तो‎ व्यवस्थितपणे आडतीवर पाठवणे‎ आदीचा खर्च न केलेला बरा, असे‎ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली‎ आहे. यामुळे परिसरातील शेकडो‎ एकरवर कांदा तसाच पडून आहे.‎ सातत्याने भाव कोसळत असल्याने‎ कांदा उत्पादक शेतकरी हताश होत‎ चालला आहे. कांद्याला मिळणाऱ्या‎ भावामुळे शेतकऱ्यांत नैराश्याची भावना‎ निर्माण झाली आहे. पावसाळ्यात‎ अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या‎ आशा कांदा उत्पादनावर केंद्रीत झाल्या‎ होत्या, परंतु त्यावरही पाणी फेरले.‎

सरकारने युक्तिवाद नको‎ अनुदान जाहीर करावे‎
सरकारने केवळ युक्तिवाद करून‎ कांदाप्रश्नी शेतकऱ्यांची चेष्टा करू नये.‎ शेतात दहा रुपये गुंतवले तर प्रत्यक्षात पाच‎ रुपये मिळणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे‎ तत्काळ शेतकऱ्यांच्या मागणीची दखल‎ घेऊन कांद्याला अनुदान जाहीर करावे.‎ अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होतील.‎ - अंनत डोके, तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी‎ संघटना, भूम.‎

मजुरी, वाहतूक खर्चही निघेना‎
सध्या कांद्याचा उत्पादन खर्च तर निघालाच नाही. मात्र, काढण्यासाठीची मजुरी व‎ वाहतूक करण्याचाही खर्च निघण्याची शक्यता नाही. यामुळे शेतकरी कांदा हा‎ शेतातच पडून ठेवण्यात धन्यता मानत आहेत. सरकारच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे‎ डोळे लागले आहेत. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने मिळून कांद्याच्या‎ नुकसानीबद्दल अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे.‎

सर्वसामान्यांना दिलासा, शेतकऱ्यांचे काय?‎
महागाईच्या काळात कांदा सर्वसामान्यांना दिलासा देत आहे तर शेतकऱ्यांच्या‎ डोळ्यात पाणी आणत आहे. घटती मागणी आणि वाढलेल्या उत्पादनामुळे मागील‎ काही दिवसांपासून कांद्याला २ ते १० रुपये किलोपेक्षा अधिक दर मिळाला नाही.‎

बातम्या आणखी आहेत...