आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझोपलेल्या सरकारला जाग यावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी अन्न, पाणी त्याग करून देहत्यागाची तयारी ठेवून बुधवार (दि.१५) पासून आमरण उपोषण करत पंढरपूर ते आळंदी उपोषण प्रवास यात्रेची सुरुवात उमरगा-तुळजापूर येथून केली आहे.
बियाणे, खते बाजारात मिळत नसल्याच्या अडचणीत शेतकरी आहे. मागील चार महिन्यात राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण खुप वाढले आहे. मात्र, सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या राज्य सरकारला जागे करण्यासाठी आमरण उपोषण दिंडी प्रवास यात्रेस उमरगा येथून सुरू केली असून प्राचार्य दिलीप गरूड यांनी शुभेच्छा दिल्या. दुपारी तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र इंगळे यांनी यात्रेच स्वागत करीत विनायकराव पाटील यांच्या सोबत तुळजामातेची यथोचित आरती केली व पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. या प्रवास यात्रेत पाटील यांच्यासोबत नितीन पाटील, अनंत कवठे, अतुल सोनवणे, सतीश भाऊ पवार, राहुल सोनवणे, दत्तात्रय बिराजदार, अनिल माने यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.