आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगाम:शेतकऱ्यांना यंदा भरघोस उत्पन्नाची‎ आशा, उसनवारी करत काळ्या आईची ओटी भरण्यासाठी बळीराजा सज्ज‎

उमरगा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र असून‎ त्यात कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे. यंदा‎ अवकाळी पाऊस सुरूच असल्याने‎ पेरणीपूर्व मशागतीला विलंब झाला आहे.‎ हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा‎ पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.‎ सध्या शेतकरी खरीप पेरणीपूर्व‎ मशागतीच्या कामात व्यस्त आहेत.‎

गतवर्षी अतिवृष्टीमुळे जेमतेम उत्पन्न‎ निघाले. त्यात विमा कंपनीने हवालदिल‎ केल्याने शेतकरी असमाधानी दिसून येत‎ आहे. मृग नक्षत्र सुरूवात होण्यास एक‎ महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने‎ पाऊस होण्यापूर्वी शेतीतील कामे पूर्ण‎ करत पेरणीसाठी शेतजमीन तयार‎ ठेवण्याच्या कामात शेतकरी गुंतल्याचे‎ चित्र दिसून येत आहे.

सध्या शेतात‎ धसकटे काढणे, शेणखत टाकणे, औत‎ मारणे, नांगरणी आदी कामे सुरू आहेत.‎ निसर्गाच्या आशेवर वर्षाचे आर्थिक‎ अंदाज बांधत नियोजन करणारा शेतकरी‎ यंदा तरी भरघोस उत्पन्न निघेल, या‎ भ्रामक आशेवर पेरणीपूर्व मशागतीची‎ कामे उरकून घेण्याच्या घाईत आहेत.‎ सर्वकाही सुखकर होइल, असूनही

अाशा‎ साेडली नाही

‎ गतवर्षी सोयाबीनचे चांगले‎ उत्पन्न निघाले, परंतु अर्धा माल‎ अद्याप विकला गेला नाही. जो‎ विकला त्याचे पैसे गतवर्षीचे देणे‎ देण्यातच गेले. आता पुन्हा उसनवारी‎ करण्याची वेळ आली आहे.‎ चांगल्या उत्पन्नाच्या आशेने‎ पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू‎ केली आहेत.

- तात्याराव भोसले,‎ शेतकरी.‎

काढलेलं कर्ज‎, उसनवारी निघालेल्या उत्पन्नावर फेडता येईल, या‎ आशेने मशागतीच्या कामाला सुरुवात‎ केली आहे. खरीप हंगाम सुरू होणार‎ असल्याने आर्थिक चणचण असतानाही‎ उसनवारी करत काळ्या आईची ओटी‎ भरणे गरजेचे असल्यामुळे तयारी‎ करावी लागल्याचे शेतकऱ्यांनी‎ सांगितले.

सध्या अवकाळी पावसाने‎ उघाड दिली आहे. उन्हाळ्याचे दिवस‎ असल्यामुळे शिवार रिकामे झाले असून‎ शेतकरी शेतातील बांध बंदिस्ती,‎ धसकट वेचणे, शेणखत टाकणे,‎ नांगरणी, कुळव, जमीन सपाटीकरण,‎ मोगडणी, बांधावर मुरुम व मातीचा‎ भराव, पालापाचोळा जमा करणे,‎ झाडांची खोडं काढणे आदी कामे‎ जोमाने सुरू आहेत.

मजूर मिळत‎ नसल्याने शेतकऱ्यांना स्वतः काम‎ करावी लागत आहे. काही ठिकाणी रब्बी‎ हंगामातील उशीरा पेरा झालेल्या‎ पिकांच्या काढणीची कामे सुरू आहेत.‎ हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा‎ मान्सून लवकरच येण्याची शक्यता‎ गृहीत धरून तालुक्यातील बि-बियाणे व‎ खते विक्रेत्यांनी विविध कंपनीचे खते व‎ बियाण्यांचा साठा करण्यास सुरुवात‎ केली आहे. कृषी विभाग सज्ज‎ झाला असून बि-बियाणे व खत‎ विक्रेत्यांना आता पावसाची प्रतीक्षा‎ लागली आहे.‎