आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिय्या‎:शेतकऱ्यांचा महावितरणसमोर ठिय्या‎

तामलवाडी‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा व‎ सांगवी (काटी) शिवारातील तीन‎ विद्युत रोहित्रातील सुमारे सहाशे ते‎ सातशे लिटर ऑइलची चोरी‎ झाल्यामुळे मागील पाच ते सहा‎ दिवसांपासून येथील विद्युत रोहित्र‎ बंद असल्यामुळे वीज पुरवठा‎ पूर्णपणे खंडित झाला असून‎ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत‎ आहे. ऑईल चोरी प्रकरणी‎ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी‎ तामलवाडी पोलिस स्टेशनमध्ये‎ रितसर फिर्याद देऊन गुन्हा दाखल‎ केला आहे. मात्र, दुसरीकडे‎ ऑईल अभावी विद्युत रोहित्र बंद‎ ठेवल्यामुळे शेतकरी संतापले‎ आहेत. याच कटकटीला वैतागून‎ सोमवारी (दि.६) मार्च रोजी‎ माळुंब्रा येथील शेतकऱ्यांनी ३३‎ केव्ही उपकेंद्रासमोर ठिय्या केला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रब्बी हंगामाची पिके शेवटच्या‎ टप्यात असून अनेक शेतकऱ्यांची‎ ऊसाची लागवड सुरु आहे.‎

अशातच विद्युत रोहित्रातील‎ ऑईलची चोरी झाल्यामुळे‎ वीजपुरवठा खंडित झाला आहे.‎ उसाला आळवणी देता येत‎ नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले‎ आहेत. महावितरणचे कर्मचारी‎ ऑईल उपलब्ध होईल तेंव्हाच‎ वीजपुरवठा सुरळीत करु असे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सांगत आहेत त्यामुळे‎ शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड‎ तिकडे विहीर अशी झाली आहे.‎ संबंधित विभागातील वरिष्ठ‎ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने‎ लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत‎ करावा, अशी मागणी भाजप‎ किसान सेलचे तालुका अध्यक्ष‎ गजानन वडणे, प्रभाकर वडणे,‎ राजकुमार वडणे आदी‎ शेतकऱ्यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...