आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा खरीप २०२२ मधील पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे. त्या मंडळातील नुकसानीची सरासरी काढून त्या प्रमाणे विमा देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. केंद्र सरकार कडील हप्त्याची रक्कम उपलब्ध होताच, या शेतकऱ्यांना विमा वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव जिल्हयातील अनेक शेतकरी अजुनही पीक विम्यापासुन वंचित आहे. पंचनाम्याच्या प्रती अद्याप उपलब्ध करुन दिल्या नाहीत. तसेच नुकसान भरपाई मध्ये केलेली ५० टक्के नियमबाह्य कपात व पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत विमा कंपनीकडून कार्यवाही होत नाही. त्यामुळे मंगळवारी आमदार पाटील यांनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन विभागीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी यांची भेट घेवून चर्चा केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.