आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलवाटोलवी:‘सिग्नल’चा फुटबॉल‎; सिग्नलअभावी धाराशिवमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा‎

धाराशिव‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सिग्नल व्यवस्थेचा फुटबॉल झाला‎ आहे. नगरपालिका व पोलिसांच्या‎ लाथाळ्यांमुळे लाखो रुपये खर्चून उभारलेली‎ ही यंत्रणा धूळखात पडून आहे. पोलिस‎ विभागाने सिग्नल हँडओव्हर करून‎ घेण्यासाठी तीन दिवसांपासून पालिका प्रयत्न‎ करत आहे. मात्र, आम्ही केवळ यंत्रणा वापरू‎ शकतो, देखभाल दुरुस्तीसाठी निधी नाही,‎ तेव्हा आम्ही हँडओव्हर कसे करून घेणार,‎ असा प्रश्न पोलिस उपस्थित करत आहेत.‎ त्यामुळे दोन्ही विभागांच्या समन्वयातून यावर‎ कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज‎ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.‎

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,‎ राजमाता जिजाऊ चौक, महात्मा बसवेश्वर‎ चौक, लहुजी वस्ताद साळवे चौक, संत‎ गाडगेबाबा महाराज चौक येथे आठ वर्षांपूर्वी‎ सिग्नल उभारले. मात्र, आतापर्यंत ते कधीच‎ सलग दोन महिने सुरू राहिले नाहीत. दोन‎ दिवसांपूर्वीच सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली.‎ मात्र, अनेक सिग्नल आपोआप बंद पडत‎ आहेत. दरम्यान, सिग्नल यंत्रणा पोलिसांच्या‎ ताब्यात देण्यासाठी नगरपालिका तीन‎ दिवसांपासून प्रयत्न करत असल्याचे‎ मुख्याधिकारी वसुधा फड यांनी सांगितले. मात्र,‎ सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ती वापरुन‎ वाहतूक नियमनाची आमची जबाबदारी आहे.‎ यंत्रणेच्या देखभालीसाठी पोलिसांकडे‎ अतिरिक्त निधी येत नाही, त्यामुळे ही यंत्रणा‎ आम्ही आमच्या ताब्यात कशी घेणार, असा‎ प्रश्न वाहतूक शाखेचे सहायक पोलिस‎ निरीक्षक अमित मस्के यांनी उपस्थित केला.‎ वाहतूक पोलिस व पालिकेच्या टोलवाटोलवीत‎ प्रश्न अडकला आहे.

सिग्नल नसल्याने शहरातील विविध चौकांमध्ये आहेत या समस्या‎

१. सिग्नल का बंद आहेत ?‎ उत्तर : सिग्नल बंद नाहीत, पोलिसांकडून‎ याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.‎ २. गतवर्षी तीन लाख खर्चूनही उपयोग‎ नाही ?‎ उत्तर : इतका खर्च येत नाही, दरवर्षी‎ एखाद्या लाखामध्ये देखभाल होऊ शकते.‎ ३. वारंवार सिग्नल बंद पडण्याचे काय‎ कारण ?‎ उत्तर : वापर बंद झाल्यानंतर रोज ते ब्लिंक‎ मोडवर ठेवावे लागतात. पूर्ण बंद केल्यावर‎ त्याची बॅटरी उतरते. रोज बॅटरी चार्ज‎ करणे शक्य नाही. यामुळे वारंवार बिघाड‎ होतोय.‎ ४. आता काय उपाय केला जात आहे ‌?‎ उत्तर : आम्ही ही यंत्रणा वाहतुक‎ पोलिसांकडे हँडओव्हर करत आहोत.‎ मात्र, तीन दिवसांपासून त्यांचा प्रतिसाद‎ नाही.‎

मेन स्विच बंद करणारा कोण ?‎
सिग्नल वापरानंतर "ब्लिंक'''' मोडवर ठेवावे लागतात.‎ मात्र, मेन स्विचच बंद केले जाते. यामुळे याची बॅटरी‎ चार्ज होत नसून ते कायमचे बंद पडतात. दररोज बॅटरी‎ चार्ज करणे शक्य नाही. तेव्हा दीर्घकाळासाठी सिग्नल‎ बंद पडतात. यासाठीच कोणी मेनस्विच बंद करीत नाही‎ ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‎

यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार‎
वरिष्ठांना यासंदर्भात माहिती देण्यात येईल. आम्ही‎ केवळ सिग्नल यंत्रणेचा उपयोग करू वाहतुक‎ सुरळीत करू शकतो. देखभालीसाठी आमच्याकडे‎ निधीही नसतो. यंत्रणा पालिकेनेच सांभाळावी.‎ -अमित मस्के, सहाय्यक पोलिस निरीक्षक.‎

बातम्या आणखी आहेत...