आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Osmanabad
  • ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​frontier, Increase In Commission, Fair Price Shopkeepers Strike

निवेदन:​​​​​​​कमिशन वाढवण्याची मागणी, रास्त भाव दुकानदारांचे धरणे‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रास्त भाव धान्य दुकानदारांना‎ कमिशन वाढून द्या, मोफत धान्याचे ‎प्रलंबित बिल तत्काळ वितरीत करा ‎यासह विविध मागण्यांसाठी रास्त‎ भाव दुकानदार संघटनेच्या वतीने ‎ ‎ उमरगा येथे एक दिवसीय धरणे ‎ ‎ आंदोलन करुन तहसीलदारांना‎ निवेदन देण्यात आले.‎ निवेदनात म्हटले आहे की, केंद्र ‎ ‎ शासनाच्या नवीन धोरणानुसार‎ जानेवारी २०२३ पासून रेशन‎ दुकानदारांनी लाभार्थींना एकाच‎ योजनेचे धान्य मोफत वाटप करण्याचे‎ आदेश दिल्याने दुकानदारांना एकही‎ रुपया मिळणार नाही.

महिनाभर पैसे न‎ मिळाल्यास दुकानाचे भाडे,‎ कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल,‎ स्टेशनरी व इतर खर्चाचे ओझे असह्य‎ होणार आहे. मोफत धान्य विक्रीचे‎ कमिशन दुकानदारांना महिन्याच्या‎ पाच तारखेपर्यंत मिळावे.

वाहतुकीत‎ होणाऱ्या धान्य गळतीमुळे धान्य कमी‎ येते, त्याचा आर्थिक फटका‎ दुकानदारांना बसत आहे. सर्व्हरच्या‎ समस्येमुळे पॉश मशीन व्यवस्थित‎ दुरुस्ती करण्याचे नियोजन करावे. इतर‎ राज्यांप्रमाणे दुकानदारांना दरमहा‎ मानधन द्यावे, २५ हजार रुपयांप्रमाणे‎ मानधन द्यावे. सर्व सुविधा ऑनलाइन‎ असताना ऑफलाइन रजिस्टर‎ नोंदवही किंवा रेकॉर्ड ठेवण्याची‎ सक्ती करू नये, प्रति क्विंटल‎ धान्याची दोन किलो तूट ग्राह्य धरावी.‎

शेतकरी लाभार्थींचे धान्य त्वरित‎ उपलब्ध करुन द्यावे. या मागण्यांचा‎ विचार न केल्यास फेब्रुवारीचे धान्य‎ उचल व वाटप होणार नाही. तसेच‎ रास्त भाव दुकानदारांना गॅस एजन्सी,‎ सीएससी सेंटर व लाइट बिल भरणा‎ केंद्र मिळावे. निवेदनावर तालुका‎ संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव‎ गायकवाड, उपाध्यक्ष शिवानंद बब्बे,‎ सचिव बालाजी पोतदार, सहसचिव‎ उज्वलाताई बिराजदार, कार्याध्यक्ष‎ श्रीधर पवार, दुकानदारांच्या स्वाक्षरी‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...