आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त‎ स्वातंत्र्य सैनिकांचा हासेगावात गौरव‎

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत‎ महोत्सवानिमित्त हासेगाव (शि) येथे‎ स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात‎ आला. कळंब तालुक्यातील हासेगाव‎ (शि) येथील श्री लक्ष्मी बहुउद्देशीय‎ सेवाभावी संस्था व स्फूर्ती फाउंडेशन‎ कळंब यांच्या वतीने हासेगाव (शि) येथे‎ मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत‎ महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिकाचा‎ गौरव व एकदिवसीय चर्चासत्र आयोजित‎ करण्यात आले होते.‎ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय‎ स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक‎ अनिल यादव होते, तर प्रमुख मार्गदर्शक‎ म्हणून जिल्हा कार्यवाहक प्रमोद‎ बाकलीकर उपस्थित होते. यावेळी‎ विकास राऊत, सरपंच प्रायली गवळी,‎ उपसरपंच अर्चना मळगे, वरिष्ठ‎ अधिकारी संतोष राऊत, राजाभाऊ‎ मळगे, स्फूर्ती फाउंडेशनचे शिवाजीराव‎ गिड्डे, मकरंद पाटील यांची प्रमुख‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपस्थिती होती.‎ यावेळी पहिल्या सत्रात संघ व‎ समरसता या विषयावर प्रा. विजय घोळवे‎ यांनी माहिती विशद केली. दुसऱ्या सत्रात‎ गोसंवर्धन व सेंद्रिय शेती याविषयावर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हा गोसेवा प्रमुख नवनाथ खोडसे‎ यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात‎ मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर‎ प्रमोद बाकलीकर यांनी मार्गदर्शन केले.‎ यावेळी रावसाहेब गंभिरे, रविकांत गिरी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर पवार, संतोष‎ कानडे, सचिन गवळी आदी उपस्थित‎ होते. सूत्रसंचालन व आभार स्फूर्ती‎ फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे‎ पाटील यांनी केले.‎

जिल्हा कार्यवाहक प्रमोद बाकलीकर, जिल्हा संघचालक‎ अनिल यादव यांच्या हस्ते शिराढोण, नागुलगाव, जवळा,‎ गौरगाव, एकुरगा, देवधानोरा आदी गावातील लक्ष्मण बोंदर,‎ दिनकरराव बोंदर, भालचंद्र वाटाणे, नारायण मिरगणे, शिवाजी‎ थोरात या स्वातंत्र्य सैनिकासह यमुनाबाई बोंदर, काशीबाई बोंदर,‎ द्रोपपदीबाई भोसले, समाबाई गायकवाड, प्रयागबाई नहाने या‎ महिला स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला.‎ मराठवाडा मुक्ती संग्राम हा सर्वसामान्य नागरिकांचा उठाव‎ होता. कोणताही नेता नसतात उभा राहिलेला संग्राम होता. विशेष‎ म्हणजे यात महिलांचा उल्लेखनीय सहभाग होता. मोठा त्रास‎ सहन करून या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी स्वतःला झोकून दिले‎ होते असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा‎ कार्यवाहक प्रमोद बाकलीकर यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...