आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहमीभावाने हरभरा खरेदी करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. मंगळवारपासून (दि.१४ मार्च) जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, लोहारा येथील केंद्र सुरू झाले आहेत. उर्वरित सहा केंद्रावर आगामी दोन दिवसात हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांना हरभऱ्याला प्रति क्विंटल ५३३५ रुपये भाव मिळणार आहे. आडत बाजारात हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी चार हजार रुपये भाव मिळत होता.
शासनाने एक मार्चपासून हमीभाव खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदी घेण्यास सुरूवात केली . त्याप्रमाणे जिल्ह्यातील नऊ हमीभाव खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हरभऱ्याची नोंद केली. जिल्ह्यातील तीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. उर्वरित सहा हमीभाव खरेदी केंद्रही दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत. केंद्रातील सुविधा व आलेला माल ठेवण्याची व्यवस्था पाहून खरेदी करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात येत आहे.
आडत बाजारातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हरभरा कमी भावाने खरेदी केला खत, बियाण्याचे पैसे देण्यासाठी दोन महिन्यात शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने हरभऱ्याची विक्री केली. सध्या हमीभाव मिळत असल्याने आनंद व्यक्त होत आहे. शासनाने दोन महिन्यांपूर्वीच हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
हमीभावासाठी ऑनलाइन नोंदणी
शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला शासकीय हमीभाव खरेदी केंद्रात सरासरी ५३३५ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे भाव मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी ई-पीक पाहणी केलेला ७/१२, आठ-अ, बँक पासबुक व आधार कार्डसह शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर भेट देऊन नोंदणी करावी. १४ मार्च रोजी तीन केंद्र सुरू केले असून दोन दिवसांत उर्वरित केंद्र सुरू होणार आहेत. -मनोज बाजपे, जिल्हा पणन अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.