आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेची व्यथा:कोरोनाने पती गेले, वर्षापासून खेटे;‎ अनुदान सोडा, माहितीही देत नाहीत

धाराशिव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला,‎ सरकारनेच योजना सुरू केल्यामुळे ५०‎हजार सानुग्रह‎अनुदानासाठी एका‎वर्षापूर्वीच‎ऑनलाइन अर्ज‎केला. परंतु,‎तेव्हापासून‎जिल्हाधिकारी‎ कार्यालयात फेऱ्या मारत आहे. अद्याप‎ अनुदान मिळाले नाही. कोणी याची‎ माहितीही देत नाही'' शासनाकडूनच‎ आमची क्रुर थट्टा सुरू आहे, अशी व्यथा‎ मांडताना कमल सदाशिव राजमाने (७०,‎ रा. नांदुरी, ता. तुळजापूर) यांच्या‎ डोळ्यातून अश्रू तरळले. कोरोनात मृत्यू‎ झालेल्यांचे अनेक वारसदार सानुग्रह‎ अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात‎ फेऱ्या मारत आहेत.‎ राज्य सरकारने कोरोना काळात मृत्यू‎ झालेल्यांच्या वारसांना ५० हजार रुपये‎ सानुग्रह अनुदान देण्याची योजना नोव्हेंबर‎ २०२१ मध्ये सुरू केली.

मात्र, याेजनेचा‎ हेतू १५ महिन्यांनंतरही साध्य झाला नाही.‎ नांदुरीच्या कमल राजमाने यांच्या पतीचा‎ कोरोनात मृत्यू झाला. त्यांनी ५०‎ हजारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया केली.‎ अर्ज करून वर्ष होत आले तरीही‎ त्यांना अनुदान मिळाले नाही. त्यांना‎ सातत्याने जिल्हाधिकारी‎ कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत‎ आहेत. आपत्ती व्यवस्थापन‎ विभागाकडे पाठपुरावा करावा‎ लागत आहे. विभागानेही सर्व‎ प्रक्रिया पूर्ण केली, त्यांचे कागदपत्र‎ पुन्हा पाठवण्यात आले. राजमाने‎ यांच्याप्रमाणे सुमारे एक हजार‎ लाभार्थींचे कागदपत्र पुन्हा‎ पाठवण्यात आले. परंतु, त्यांना‎ अनुदान मिळाले नाही. कोरोनाने‎ घरातील प्रिय व्यक्तीचा मृत्यू‎ झाल्यानंतर झालेल्या वेदनांपेक्षा‎ राज्य सरकारकडून होणाऱ्या‎ हेळसांडीचा त्रास आहे.‎

तीन हजारांपेक्षा अधिक अर्ज‎
अनेकांनी सुरुवातीलाच प्रस्ताव सादर‎ करूनही अनुदान मिळाले नाही. राज्य‎ सरकारच्या पोर्टलच्या माध्यमातून अनुदान‎ मिळण्यासाठी तीन हजारापेक्षा अधिक‎ जणांनी अर्ज केले. जिल्हा रुग्णालय व‎ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून‎ प्रक्रिया करून सर्व प्रस्ताव शासनाकडे‎ पाठवले. त्यांना अनुदान मंजूर झाल्याचे‎ पोर्टलवर दाखवण्यात येत आहे. मात्र,‎ प्रत्यक्षात किती जणांना रक्कम दिली, याची‎ माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नाही.‎

चार महिने पोर्टल बंद‎
चार महिन्यांपासून तर योजनेचे पोर्टलच‎ बंद होते. यामुळे नेमकी काय प्रक्रिया‎ सुरू आहे, प्रक्रिया कोठे पोहोचली,‎ यासंदर्भात जिल्हाधिकारी‎ कार्यालयातील अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांनाही माहिती कळत नव्हती.‎ यामुळे अनेकांचा योजनाच बंद‎ झाल्याची खात्री झाली होती. आता ३०‎ दिवसांपूर्वी पुन्हा पोर्टल सुरू केले आहे.‎ सध्याही पोर्टलवर काही समजत नाही.‎

सरकार बदलले, अस्वस्थता‎
राज्यात ठाकरे सरकारने ही योजना‎ सुरू केली होती. सुरुवातीपासूनच‎ योजनेला घरघर लागली होती. राज्यात‎ सत्ताबदल झाला आहे. नवीन सरकारने‎ जुन्या योजना बंद करण्याचा सपाटाच‎ लावला. यामुळे अनुदानापासून वंचित‎ असलेल्या लाभार्थींमध्येही अस्वस्थता‎ आहे. नव्या सरकारने ही याेजनाही बंद‎ केली की काय, असा प्रश्न विचारला‎ जात आहे. मात्र, राज्य सरकारने‎ याबाबत काहीही सांगितले नाही.‎

अनेक संसार उद्ध्वस्त‎
धाराशिव जिल्ह्यात ७६ हजार ९‎ नागरिकांना कोरोनाची लागण, ७३‎ हजार ८८५ कोरोनामुक्त.‎ कोरोनाने २११९ मृत्यू, तीन‎ हजारांहून अधिक अर्ज आले.‎५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान‎ तुटपुंजेच, ते मिळण्यासाठी‎ हेलपाट्यांमुळे निराशा.‎ रुग्णालयात १५३८ जणांचा तर ३६५‎ जणांचा मृत्यू जिल्ह्याबाहेर, दुर्धर‎ आजारात १०७ दगावले.‎

२५० पैकी ६५ जण आले‎
सातत्याने पाठपुरावा करूनही फायदा होत‎ नाही, याची जाणीव आता लाभार्थींना‎ होत आहे. यामुळे अनेकांनी अनुदानाची‎ आशा सोडली. २७ फेब्रुवारीला जिल्हा‎ तक्रार निवारण समिती बैठकीसाठी २५०‎ जणांना बोलावले होते. मात्र, केवळ ६५‎ जणांनीच सुनावणीत भाग घेतला. यापूर्वी‎ ५०० जणांच्या तक्रारींचा निपटारा करून‎ शासनाला पाठवले. मात्र, शासनाने‎ काहीच प्रतिसाद दिला नाही.‎

लवकरच अनुदान‎
पोर्टलच्या रिपोर्टमध्ये आकडा‎ कमी असला तरी अनेकांनी‎ प्रत्यक्षात अनुदान मिळाल्याचे‎ सांगितले आहे. तसेच आता पोर्टल‎ सुरू झाल्याने काही अडचण येणार‎ नाही. लवकरच सानुग्रह अनुदान‎ प्राप्त होण्यास मदत होणार आहे.‎ -वृषाली तेलोरे, जिल्हा‎ समन्वयक, आपत्ती व्यवस्थापन‎ विभाग.‎

बातम्या आणखी आहेत...