आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:सेंद्रिय शेती विकसित करणाऱ्या‎ शेतकऱ्यांचा मानपत्र देऊन सन्मान‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांतिदूत परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने‎ रविवारी (२) जकेकुर-चौरस्ता ओम‎ लॉन्स येथे तालुका व परिसरातील‎ विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य‎ करणाऱ्या व देशाच्या अमृत‎ महोत्सवाच्या निमित्त ७५ प्रयोगशील व‎ सेंद्रिय शेती विकसित करणाऱ्या‎ शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते मानपत्र‎ देऊन गौरव करण्यात आला.‎ राज्याचे माजी विशेष पोलिस निरीक्षक‎ विठ्ठलराव जाधव, शांतीदूत परिवाराच्या‎ राष्ट्रीय अध्यक्षा विद्या जाधव, राज्याचे‎ कृषी सहसंचालक डॉ तुकाराम मोटे,‎ शेतकरी दूत परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष‎ विजय ठुबे, राज्याध्यक्ष विजय बोत्रे,‎ कार्याध्यक्ष विकास देशमुख,‎ तहसिलदार बालाजी शेवाळे पुणे, माजी‎ अतिरिक्त पोलीस अधिक्षक अशोक‎ क्षीरसागर, पोलीस निरीक्षक मनोज‎ राठोड, दिपक जवळगे यांच्या उपस्थित‎ आणि उद्योजक संजय मुटकुळे यांचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अध्यक्षतेखाली शेतकरी गुणगौरव‎ मेळावा संपन्न झाला.

यावेळी शेतीसाठी‎ लागणारे सेंद्रीय बी-बियाणे, अवजारे व‎ महिला गटामार्फत उत्पादित वस्तुंचे‎ स्टॉल विक्रीस ठेवण्यात आले होते.‎ बळीराजाच्या शेतीमालाला रास्त भाव‎ मिळाला पाहिजे त्याचा सन्मान व्हायला‎ पाहिजे व कौतुक व्हायला पाहिजे म्हणून‎ यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल‎ घटकातील मुलींना शालेय शिक्षणाचे‎ साहित्याचे वाटप करण्यात आले.‎ यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात‎ बळीराजा कवी संमेलनाचे आयोजन‎ करत बळीराजाच्या सुखदुःखाच्या‎ भावना या काव्यसंमेलनाच्या वतीने‎ व्यक्त करण्यात आल्या. रसिकांनी कवी‎ संमेलनाला भरभरून प्रतिसाद‎ दिला.यावेळी धानोरीच्या विद्यामंदिरच्या‎ विद्यार्थ्यांनी लाठी खेळाचे प्रात्यक्षिक‎ केले.यावेळी ठेवण्यात आलेल्या‎ सौरऊर्जेवरील शेतीउपयोगी उपकरण‎ सहभागी शेतकऱ्यांना दाखवण्यात‎ आले.‎