आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागर भक्तीचा‎:छत्रपती शिवरायांबद्दल जे ऐकले तेच बोललो, त्या वादात‎ पडायचे नाही, मोठ्यांचा आदर करणे ही आपली संस्कृती‎‎

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मनात,‎ हृदयात आहेत. महाराजांनी आई‎ जिजामाता यांना आपले गुरू मानले. त्यांनी‎ संतांचा सन्मान केला तसेच आपल्या‎ संस्कृतीचे रक्षण केले. त्यामुळेच आपली‎ संस्कृती टिकून राहिली. छत्रपती शिवाजी‎ महाराज नसते तर आपली संस्कृती लोप‎ पावली असती, असे मत श्री श्री रविशंकर‎ यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी या कार्यक्रमात‎ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा‎ करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे रविशंकर‎ यांनी कार्यक्रमातच स्पष्टीकरण दिले.‎ महाराजांबद्दल जे ऐकलो होतो तेच‎ बोललो, मला त्या वादात पडायचे नाही.‎ मोठ्यांचा आदर करणे आपली संस्कृती‎ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.‎ तुळजापुरात गुरूवारी सायंकाळी जागर‎ भक्तीचा कार्यक्रम पार पडला.‎ कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडने गोंधळ‎ घालण्याचा प्रयत्न केला. कारण, यापूर्वी‎ एका कार्यक्रमात रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे‎ गुरू समर्थ रामदास असल्याचा उल्लेख केला‎ होता. त्यावर रविशंकर यांनी जाहीरपणे‎ स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले,आपली संस्कृती‎ टिकवून ठेवण्यासाठी अनेक पिढ्यांपासून‎ संतांनी योगदान दिले आहे. अशा संतांचा त्या‎ काळात शूर शूरविरांनी सन्मान केला. छत्रपती‎ शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे‎ तर सबंध देशाला आपल्या कार्याने प्रभावित‎ केले. त्यांना तुळजाभवानी मातेने प्रेरणा दिली.‎ तुळजाभवानी माता आपली सगळ्यांची प्रेरणा‎ आहे.

मातेला आपण गुरू, आई आणि वडील‎ मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य‎ अद्वितीय होते.त्यांनी प्रत्येकाच्या मनात आपला‎ ठसा उमटविला. त्यांनी संतांचा आदर केला तर‎ संतांनी सगळ्या जातींना आपले मानले.‎ मराठ्यांनी महाराष्ट्रातच नाही तर‎ तामिळनाडूतही राज्य केले. त्यांनी तिथेही‎ मंदिरांचे रक्षण केले.आपल्या शास्त्रात भेदाभेद‎ अमान्य आहे. अस्पृश्यता कुठेही नसावी.‎ हजारो ऋषीमुनींमध्ये ब्राह्मण मोजकेच‎ होते,अन्य जातीतले अनेकजण मुनी‎ होते.सगळेजण एकोप्याने वागत होते, ही‎ आपली संस्कृती आहे. आपणही हे टिकायला‎ हवे.

मात्र अलीकडे असे दिसत नाही. आपणच‎ आपल्या माणसांचा अगदी छोट्या छोट्या‎ गोष्टींसाठी आपण भांडू लागलो आहोत.‎ जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना समजून‎ घ्यायला हवे.त्याची दु:खे संपण्यासाठी सर्वांनी‎ प्रयत्न केले पाहिजेत. मुलांवर चांगले संस्कार‎ घडवा,आई-वडिलांचा, मोठ्या आदर‎ करायला सांगा. तुळजापुरात १२ वर्षानंतर‎ येण्याचा योग आला,त्यामुळे इथे आल्याचे‎ समाधान वाटले. तत्पूर्वी श्री श्री रविशंकर यांचा‎ कवड्याची माळ,तलवार देऊन सत्कार‎ करण्यात आला. कार्यक्रमासाठी भाविकांची‎ मोठी गर्दी होती. दरम्यान, श्री श्री रविशंकर यांनी‎ संभाजी ब्रिगेडच्या राड्यानंतर पोलिसांच्या‎ फौजफाट्यात तुळजाभवानी मातेचे दर्शन‎ घेतले.‎

जागर भक्तीचा‎
संभाजी ब्रिगेडच्या गोंधळानंतर श्री श्री रविशंकर यांचे स्पष्टीकरण, म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारतीय‎ संस्कृती टिकून, तुळजापुरात कार्यक्रम, ब्रिगेडकडून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न, गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई‎

संभाजी महाराजांचा सन्मान करतो, पण सगळ्या बाजूंनी अभ्यास करा : रविशंकर‎
कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडने गोंधळ‎ घातल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.‎ कार्यक्रमात रविशंकर यांनी महाराजांविषयी आपली‎ भूमिका मांडली तसेच अखेरच्या टप्प्यात त्यांनी थेट‎ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की‎ आपण छोट्या छोट्या गोष्टीत न पडता सगळ्या‎ बाजूंनी अभ्यास करावा.मी संभाजी महाराजांचा‎ सन्मान करतो,आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या‎ विचाराचे कार्य करता आहात,मनात कोणतीही‎ कटूता ठेवू नका.‎

२० मिनिटे ध्यान : रविशंकर यांनी‎ मार्गदर्शनानंतर ध्यानाची पद्धत सांगितली.‎ यावेळी २० मिनिटे ध्यान झाल्यानंतर विठ्ठल‎ विठ्ठल हे भजन सादर केले. यावेळी‎ भक्तांनी ताल धरला. रविशंकर यांनी‎ भक्तांमध्ये जाऊन फुलांची उधळण केली.‎

बातम्या आणखी आहेत...