आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:भूममध्ये 96 पैकी बहुतांश गावांमध्ये पथदिवे‎ दिवसरात्र सुरू रहात असल्याने विजेचा अपव्यय‎

आबासाहेब बोराडे | भूम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ग्रामपंचायतींनी रस्त्यावर‎ बसवलेले पथदिवे सकाळी बंद करण्याचे‎ व्यवस्थापन नसल्याने दिवसरात्र सुरूच‎ रहात आहेत. तालुक्यातील ७४‎ ग्रामपंचायतींमधील ९६ गावात एलईडी व‎ हायमास्ट पथदिवे बसवण्यात आले आहे.‎ मात्र, हे पथदिवे सुरू झाल्यावर ते कोणी‎ व कसे बंद करायचे याचे व्यवस्थापन‎ नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत‎ आहे.‎ तालुक्यातील सर्वात मोठ्या‎ ग्रामपंचायती ईट, पाथरुड, वालवड व‎ माणकेश्वर येथील पथदिवे बंद करण्याची‎ व्यवस्था आहे. मात्र, उर्वरित बहुतांश‎ ग्रामपंचायतींमध्ये हे पथदिवे दिवसरात्र‎ सुरू रहात आहेत. यामुळे विजेचा‎ अपव्यय होत आहे. हे पथदिवे बसवण्यास‎ काही वर्ष झाली आहेत. त्यातील लाइट‎ खराब झाल्यास किंवा अन्य कारणाने बंद‎ पडल्यास ते बंदच रहातात.

गेलेले लाइट‎ काढून ग्रामपंचायती नवीन लाइट‎ लावतात. पुन्हा ते दिवसरात्र चालु‎ राहतात. तालुक्यातील ग्रामपंचायींमध्ये‎ सर्व पथदिवे दिवसा बंद व अंधार पडताच‎ पुन्हा चालु करण्याची व्यवस्था नाही.‎पुष्कळ ग्रामपंचायतींमध्ये हायमास्ट दिवे‎ बसवण्यात आले आहेत. तेही चालुच‎ राहतात. ग्रामपंचायतींकडून नवीन दिवे‎ लावूनही ते बंद करण्याची तसदी घेतली‎ जात नसल्याने वीज वाया जात आहे. या‎ वीजबिलाचा भरणाही केला जात नाही.‎

पथदिव्यांमुळे रात्री छान प्रकाश पडतो.‎ मात्र, हे प्रखर दिवे दिवसाही सुरू रहात‎ असल्याने विजेचा प्रचंड अपव्यय होत‎ आहे. त्यामुळे दिवसा दिवे बंद‎ करण्याची व्यवस्था करण्याची मागणी‎ ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे यावर‎ तत्काळ तोडगा काढून पथदिवे दिवसा‎ बंद राहणार, हे सुनिश्चित करणे‎ आवश्यक झाले आहे.‎

भूम पालिकेचे योग्य नियोजन, दिवसा दिवे असतात बंद‎
भूम नगगरपरिषदेचा दिवसा एकही दिवा चालु नसतो. मात्र, तालुक्यातील‎ ग्रामपंचायती दिवसरात्र पथदिवे सुरू ठेवत आहेत. यासंबंधी महावितरण‎ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ‘मला प्रतिक्रिया देणे उचित ठरणार‎ नाही, याचे अधिकार वरिष्ठांचे असल्याचे सांगितले. परंतु ग्रामपंचायतींना‎ पथदिवे दिवसा बंद ठेवण्याबाबत आदेश देऊ’ असे सांगितले.‎

ग्रामपंचायतींवर कारवाई करा‎
ग्रामपंचायतींमार्फत बसवण्यात आलेले‎ पथदिवे दिवसा बंद करण्याची व्यवस्था सरपंच,‎ उपसरपंच व ग्रामसेवकांनी करावी. अन्यथा‎ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिवसा पथदिवे‎ चालु रहात असल्याबाबत ग्रामपंचायतींवर‎ कारवाई करावी. - भास्कर महादेव वारे,‎ आरटीआय कार्यकर्ते, भूम.‎

शासनाचे नुकसान, जनतेवर भुर्दंड‎
ग्रामपंचायतींनी बसवलेले पथदिवे दिवसरात्र‎ चालु रहात असल्याने विजेचा अपव्यय होत‎ आहे. यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात‎ नुकसान होत आहे. परंतु याचा भुर्दंड‎ सर्वसामान्य जनतेवर पडत आहे. - प्रल्हाद‎ आडागळे, - विधानसभा प्रमुख, युवासेना.‎

बातम्या आणखी आहेत...