आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास खुणावतो:परंड्यामध्ये ऐतिहासिक, धार्मिक स्थळांचा‎ वारसा, सुविधा वाढल्यास अर्थकारणास गती‎

परंडा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎तालुक्याला ऐतिहासिक व धार्मिक‎ स्थळांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे हा‎ भाग पर्यटकांसाठी वरदान ठरत आहे.‎ पुरातन भुईकोट किल्ला, डोमगाव येथील‎ सर्व बाजुंनी पाण्याने वेढलेले श्री‎ कल्याणस्वामी यांचे समाधी मंदिर आदी‎ ठिकाणी राज्यासह परराज्यातून‎ भाविक-भक्त तसेच पर्यटक मोठ्या‎ प्रमाणात येतात. येथे सुविधा उपलब्ध‎ झाल्यास युवकांना रोजगाराची संधी‎ उपलब्ध होऊ शकते. तसेच यामुळे‎ तालुक्यातील अर्थकारणाला गती येऊन‎ विकासात भर पडू शकते.‎ तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्प,‎ हंसराज स्वामी, प्रज्ञानंद स्वामी, अनंतदास‎ स्वामी यांची समाधी असलेला मठ,‎ श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळ भैरवनाथ,‎ जोगेश्वरी मंदिर आदी ठिकाणी राज्यासह‎ परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या‎ प्रमाणात दर्शन व पर्यटनासाठी येतात. परंतु‎ पर्यटकांना निवास व हॉटेलिंगची सुविधा‎ उपलब्ध नाही, त्यामुळे सर्वजण धावती‎ भेट देऊन परततात. तालुक्यात पर्यटकांना‎ पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. परंडा‎ तालुका महाराष्ट्रात पर्यटनाच्या नकाशावर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ येण्यासाठी पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी‎ सावंत यांनी तीर्थक्षेत्राचा दर्जा व पर्यटन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्थळांच्या विकासासाठी निधीची तरतूद‎ करणे आवश्यक आहे. कारण तालुक्यातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एेतिहिसिक व धार्मिक स्थळांचा पाहिजे तसा‎ विकास झालेला नाही.‎

सोनारी यात्रेत येतात हजारो भाविक‎
श्रीक्षेत्र सोनारी येथे श्रीकाळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर‎ आहे. चैत्र महिन्यात येथे मोठा रथोत्सव व यात्रा भरते.‎ राज्यासह परराज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात.‎ तसेच राजकीय नेते मंडळींचे कुलदैवत असल्याने येथे‎ अनेक मंत्री, आमदार, खासदार दर्शन घेण्यासाठी येतात.‎ परंतु अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामुळे अनेक‎ भाविक-भक्त दर्शन घेऊन परतीचा मार्ग धरतात.‎

६३ तोफा, २६ बुरुजांचे आकर्षण‎
भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाच वर्षांपूर्वी माजी आमदार‎ सुजितसिंह ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे पुरातत्व विभागाकडून चार‎ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मिळाला. पूर्वीचा बाज कायम ठेवून‎ बांधकाम व डागडुजीचे काम करण्यात आले. त्यामुळे किल्ला‎ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. किल्ल्याची तटबंदी‎ भक्कम असुन २६ बुरुज आहेत. या बुरुजांवर पंचधातूत व इतर‎ धातूंच्या लहान-मोठ्या ६३ तोफा पहावयास मिळतात.‎

डोमगावात हवी बोटिंगची सुविधा‎
डोमगाव येथील श्रीराम मंदिर चोहोबाजूंनी‎ पाण्याने वेढलेले आहे. येथे समर्थ रामदास‎ स्वामी यांचे शिष्य श्री कल्याणस्वामी यांची‎ वाळूची समाधी आहे. दास बोधाची मूळप्रत‎ या ठिकाणी पहावयास मिळते.‎ सीना-कोळेगाव प्रकल्पात मुबलक पाणी‎ आहे. त्यामुळे पर्यटकांना येथे पोहोचण्यासाठी‎ बोटिंगची सुविधा केल्यास पर्यटकांत वाढ‎ होऊन हॉटेल व इतर व्यवसायाला ऊर्जा मिळू‎ शकते.‎

बातम्या आणखी आहेत...