आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी:वाऱ्यामुळे वाशी तालुक्यामध्ये‎ रब्बी पिकांसह आंब्याचेही नुकसान‎

वाशी‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी (दि.७) च्या मध्यरात्रीपासून‎ इतरत्र पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे‎ तालुक्यातील अल्प प्रमाणात हजेरी‎ लावली. परंतु प्रचंड स्वरूपात सुटलेला‎ वाऱ्यामुळे रब्बी पिकासह अंबा व इतर‎ फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.‎ खरिपात पावसाने चांगलीच हजेरी‎ लावल्याने तालुक्यात रब्बीची पेरणी उशिरा‎ झाली होती. साहजिकच काढणी देखील‎ उशिरा होणार असल्याने आता कुठे तरी‎ गहू, हरभरा याच्या काढणीला कुठेतरी‎ सुरुवात झाली आहे.‎

चांगल्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे‎ अंब्यासारख्या विक्रमी उत्पादन असणाऱ्या‎ झाडांना कैऱ्या लकडून गेलेल्या पहावयास‎ मिळत होत्या. मात्र सोमवारी मध्यरात्रीनंतर‎ हवामानात बदल होऊन प्रचंड प्रमाणात‎ वारे सुटल्याने काढणी केलेला हरभरा,‎ शेतात उभा असलेला गहू जमिनीवर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लोळला आहे.

तर लगडून गेलेल्या‎ आंब्याच्या कैऱ्यांची रास जमिनीवर‎ पडल्या आहेत. राज्यातील बऱ्याच भागात‎‎‎‎ हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने‎ तालुक्यात अल्प प्रमाणात हजेरी लावली‎ पण सोमवारच्या मध्यरात्रीपासून दिवसभर‎ देखील जोराचा वारा वाहत होता.‎ दर उन्हाळयात अवकाळी पाऊस,‎‎ हिवाळयाच्या अंतिम टप्प्यातील थंडीमुळे‎ पिके खराब होतात. गारपीटीमुळे तर‎ शेतकरी पुश्रता धास्तावलेला आहे. यामुळे‎ आंबा,द्राक्षे यांचे अतोनात नुकसान होते.‎ कांद्याने दणका दिल्याने अगोदरच शेतकरी‎ नुकसानीतत गेलेला आहे . व्यापारी जो‎ भाव देतात, त्याची अत्यल्प आकडेवारी‎ अपमानास्पद आहे. उत्पादानसाठी झालेला‎ खर्चही यात निघत नाही. पाणी असले तरी‎ त्याचा पुरवठा करण्यासाठी वीजपुरवठा‎ अखंडित असणे गरजेचे आहे. तसेच‎ त्याला यार्डात भाव मिळणेही महत्वाचे‎ आहे.‎

कंपनीचे विचित्र प्रश्न‎
रब्बीच्या पिकाचा विमा भरणाऱ्या‎ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.‎ परंतु नुकसानीची तक्रार‎ करण्यासाठी पीकविमा कंपनीच्या‎ प्रतिनिधी कडे चौकशी केली असता‎ नुकसान होणारा वारा होता का या‎ बाबत नोंद ही प्रशासनाकडे झालेली‎ नाही त्यामुळे तक्रार करूनही‎ फायदा होणार नाही असे सांगण्यात‎ येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून‎ तीव्र संताप व्यक्त होऊन फक्त‎ शेतकऱ्याचे नुकसान न झाल्याची‎ खात्री होणारी यंत्रणा शासन‎ प्रशासन आणि विमा कंपनीकडे‎ कशी असते असा सवाल विचारला‎ जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना‎ जाण नाही. यावरून कळते.‎

बातम्या आणखी आहेत...