आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री ग्रामसडक योजना (२०२२-२३) या आर्थिक वर्षात एरंडवाडी ते पापनास (चोराखळी) रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे. शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पापनास (चोराखळी) हे गाव राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे आजोळ आहे.
सदर गाव तीर्थक्षेत्र ‘क’ मध्ये आहे. या परिसरात प्राचीन काळातील सर्वात मोठे पापनास मंदिर आहे. सदर मंदिराच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो भाविक येतात. परंतु मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. एरंडवाडी हे गाव टेंभुर्णी-बार्शी-लातूर (राष्ट्रीय महामार्ग ४६५) रोडवर असून, पापनास (चोराखळी) गावाकडे जाण्यासाठी शेलगाव (जहागीर) या गावातून जावे लागते. सदर रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा व धाराशिव साखर कारखान्याकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एरंडवाडी ते पापनास हा रस्ता सामाविष्ट करुन भाविक, शेतकरी व येथील नागरिकांची गैरसोय दूर करावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.