आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गारठ्यात वाढ, कमाल तापमान 5 अंशांनी घटले

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी महिन्यातील शेवटच्या‎ आठवड्यात किमान व कमाल‎ तापमानाचा पारा अधिक होता. दोन‎ दिवसांपासून वाऱ्याच्या वेगासह‎ थंडीचे प्रमाण वाढल्याने किमान १७‎ अंशावरील तापमानाचा पारा १३ तर‎ कमाल ३२ अंशावरील तापमान २७‎ अंशावर आले.

यामुळे किमान ४ तर‎ कमाल ५ अंशांनी पारा घटला. यामुळे‎ थंडावा निर्माण झाला असून सकाळी‎ धुके पडत रब्बी पिकांवर रोग पडत‎ आहेत. तापमान १३ ते १४ अंशावर तर‎ कमाल तापमान २७ ते २९ अंशावर‎ स्थिरावल्याने थंडी वाढली.‎ जानेवारीच्या शेवटी किमान तापमान‎ १७ तर कमाल ३२ अंशावर गेले होते.‎

हवेतील वेगाने थंडीत वाढ‎
वातावरणातील बदलामुळे थंडीचे प्रमाण‎ कमी अधिक होत आहे. याचा आरोग्यावर‎ परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या‎ हवेतील वेग काही प्रमाणात वाढल्याने दोन‎ दिवसांपासून थंडी वाढली आहे. आता‎ थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.‎ -ए. के. भड, तापमान निरीक्षक,‎ उस्मानाबाद.‎

चार दिवसांनी पुन्हा‎ होणार थंडी गायब‎
आठ दिवसांपूर्वी‎ जिल्ह्यातील कमाल‎ तापमानाचा पारा ३२ अंशावर‎ होता. मात्र, दोन‎ दिवसांपासून वातावरणात‎ बदल झाला असून वाऱ्याचा‎ वेग काही प्रमाणात वाढला‎ आहे. यामुळे थंडावा वाढला‎ असून किमान तापमान ४ व‎ कमाल तापमान ५ अंशाने‎ कमी झाले आहे. मात्र,‎ आगामी चार दिवसांनंतर‎ पुन्हा थंडी कमी होऊन‎ तापमानाचा पारा वाढण्याची‎ शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...