आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादुर्भाव‎:ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव‎

भूम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे‎ हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव ‎ ‎ झाला आहे. अतिवृष्टी व सततच्या ‎ ‎ पावसामुळे खरिपातील सोयाबीन, ‎उडीद, मूग ही पिके हातची गेली. त्यामुळे रब्बीतील हरभरा पिकावर ‎शेतकऱ्यांच्या आशा केंद्रीत झाल्या ‎ ‎ आहेत.‎ शेतकऱ्यांनी संकटातून सावरुन‎ रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा‎ व ज्वारी पिकांची पेरणी केली.‎ तालुक्यात १७ हजार ३९१ हेक्टर‎ क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली‎ आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून‎ भूम तालुक्यात ढगाळ वातावरण आहे.

पहाटे दाट धुके पडत आहे. या‎ बदलत्या वातावरणाचा पिकांना‎ फटका बसत आहे. त्यामुळे रब्बी‎ पिकही वाया जाणार काय, अशी‎ भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.‎ यावर्षी निसर्गाने साथ न दिल्याने‎ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात‎ नुकसान सहन करावे लागत आहे.‎ अशी स्थिती राहिली तर‎ शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा‎ प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रब्बी‎ हंगामातील हरभरा पिकावर‎ शेतकऱ्यांची भिस्त आहे. परंतु‎ ढगाळ वातावरणामुळे हरभरा‎ पिकावरही अळ्यांचा प्रादुर्भाव‎ झाला आहे. त्यामुळे हरभऱ्याचे‎ उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...