आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षवल्ली:पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी नवी‎ संवेदनशील पिढी तयार होणे गरजेचे‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात एकुरगा येथे श्री शिवशक्ती‎ विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेना व इको‎ क्लब व सामाजिक वनीकरण विभाग‎ योजनेअंतर्गत "प्रसार प्रसिद्धी" कार्यक्रम‎ सोमवारी (६) आयोजित करण्यात‎ आला.‎ ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष‎ तथा मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे‎ अध्यक्षस्थानी होते. यावेळी सामाजिक‎ वनीकरण विभागाचे वनरक्षक काका‎ मगर,वनसेवक व्यंकट पाटील, ऑपरेटर‎ विष्णू कांबळे उपस्थित होते. यावेळी‎ विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या सद्यस्थिती‎ बाबत विविध उपक्रमाद्वारे अद्यावत‎ माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या‎ प्रत्यक्ष कामांमध्ये सहभागी करून घेणे,‎ त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये‎ जनजागृती करणे, लोकसहभाग वाढवणे‎ ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.‎

पर्यावरणाच्या प्रश्नाची जाण असलेली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संवेदनशील नवीन पिढी तयार करण्याचे‎ महत्त्वाचे काम या योजनेतून केले जाईल‎ या विषयी माहिती देण्यात‎ आली.विद्यार्थ्यांना वनपरिक्षेत्र सामाजिक‎ वनीकरण कार्यालय उमरगा हरित सेना‎ अंतर्गत प्रचार प्रसिद्धी अंतर्गत प्रजोक्टर‎ व्हिडिओच्या माध्यमातून पर्यावरणाचा‎ ऱ्हास कसा होत आहे याची माहिती‎ देण्यात आली. तसेच टाकाऊ पाणी‎ बाटली पासून रोप कसे तयार करायचे,‎ टाकाऊ बांबूपासून रोपांना ट्रीगार्ड‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बनवणे, पालापाचोळा गोळा करून‎ गांडूळ खत तयार करणे, तसेच एक झाड‎ एक विद्यार्थी संकल्पना शाळेत‎ राबविण्यात यावी ही माहिती व्हिडिओ‎ माध्यमातून देण्यात आली.‎ कार्यक्रमासाठी हरित सेना शिक्षक‎ सोमनाथ म्हेत्रे यांनी परिश्रम‎ घेतले.यावेळी अध्यक्ष श्री बोंडगे म्हणाले‎ की, वृक्ष हेच आपले खरे मित्र आहेत.‎

यासाठी या झाडांचे आपण संगोपन‎ करावे. आपल्या जीवनाच्या प्रारंभापासून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ते अखेरपर्यंत झाडामुळेच प्राणवायू‎ मिळतो. पर्यावरणाचा कायम समतोल‎ ठेवण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज‎ आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी झाडाचे‎ संगोपन करावे,असे आवाहन केले.‎ कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक‎ धनराज पाटील, राजेंद्र सगर, विजया‎ गायकवाड, सिद्धेश्वर वाकडे, महादेव‎ करके, माळाप्पा कोकरे, दत्तू कांबळे,‎ मोहन दुधंबे, शिवाजी चेंडके यांच्यासह‎ शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

एकुरगा शिवशक्ती विद्यालयात पर्यावरण प्रसार व प्रसिध्दी‎
इंटरनेट आणि मोबाइलच्या प्रसारामुळे अपारंपारिक उर्जा‎ स्त्राेतासह पर्यावरण, जंगल तसेच वन्यप्राणी व पशुपक्षी‎ यांच्यासंदर्भातही शालेय विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता रूजविण्याचा‎ प्रयत्न केला जात आहे. यामध्ये सामाजिक संस्थांचाही उत्साही‎ सहभाग असून याला वाढता प्रतिसाद आहे.

मोठया प्रमाणावर‎ वृक्षारोपण होत असले तरी त्यात विदेशी झाडांचा प्रसार भारतीय‎ पर्यावरणात योग्य ठरत नाही. अशा विदेशी रोपांचा काही‎ उपयोग नसतो. त्याऐवजी फळे येणाऱ्या झाडांचे रोपण केले तर‎ जंगलांमधील प्राणी शहरात वावरण्याचे प्रमाण कमी होईल.‎ सोमवारी पुणे परिसरात एक बिबटया रस्त्यावर हिंडताना दिसला‎ यामुळे नागरिक भयभीत झाले. असे प्रकार पुन्हा दिसू नये‎ यासाठी पर्यावरण सुधारणे गरजेचे आहे. केवळ दिसायला‎ चांगली म्हणून निरर्थक रोपे लावण्यापेक्षा ऑक्सिजन देणारी‎ झाडे लावणे आवश्यक आहे.‎

बातम्या आणखी आहेत...