आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:चोरी झालेली मालमत्ता‎ परत मिळाल्याने आनंद‎

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरी गेलेले दागिने, मोबाईल,‎ दुचाकी परत मिळाल्यामुळे संबंधित‎ नागरिकांच्या चेहऱ्यांवर हास्य‎ फुलले. पोलिस अधीक्षक अतुल‎ कुलकर्णी यांच्या पुढाकारातून हा‎ उपक्रम राबवण्यात आला.‎ घरात किंवा बाहेर कोठेही चोरी‎ झाली तर गेलेला माल परत‎ मिळण्याची सध्या शाश्वती‎ राहिलेली नाही. मात्र, एसपी अतुल‎ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात‎ जिल्ह्यात अनेक चोऱ्यांचा छडा‎ लावण्यास पोलिसांना यश आले‎ आहे.

याचाच परिपाक म्हणून‎ जिल्ह्यातील चोरीला गेलेला‎ संबंधितला मुद्देमाल देण्यासाठी‎ विशेष माेहीम राबवण्यात आली.‎ यामध्ये पोलिस अधिक्षक‎ कार्यालयात एका कार्यक्रमात‎ मुद्देमाल परत करण्यात आला.‎ यासाठी अगोदरच न्यायालयीन‎ प्रक्रिया राबवण्यात आली. गेल्या‎ तीन महिन्यात पोलिसांनी वाशी‎ ठाण्याच्या ३, उस्मानाबाद ग्रामीण ५,‎ येरमाळा १, तुळजापूर ५, ढोकी १,‎ तामलवाडी २, बेंबळी १ असा ऐवज‎ पोलिस परत करणार आहेत.‎

जॅक टाकून वाहने‎ लुटलेला मालही परत‎
काही दिवसांपूर्वी रात्री येडशी ते‎ ढोकी रस्त्यावर रात्रीच्या दरम्यान चार‎ जणांच्या टोळीने रस्त्यावर जॅक‎ टाकून तीन वाहने लुटली होती.‎ यामध्ये एक दुचाकीसह दोन‎ जीपांमधील ८८ हजारांचा ऐवज‎ लुटण्यात आला होता. स्थानिक गुन्हे‎ शाखेच्या पथकाने मोठ्या धाडसाने‎ टोळीला पकडले. यावेळी त्यांची‎ मोठी चोरट्यांसोबत मोठी झटापट‎ झाल्याचे एसपी कुलकर्णी यांनी‎ सांगितले.‎

२५ तोळे सुनेनेच चोरले‎
उमरगा तालुक्यातील एका‎ प्रकरणात वेगळाच प्रकार समोर‎ आला. एका घरात सुनेनेच २५ तोळे‎ सोन्याचे दागिने चोरून कोरड्या‎ पाण्याच्या टाकीत ठेवले. तसेच‎ दागिन्यांची चोरी झाल्याची आवई‎ उठवली. पोलिसांनी घरातील सर्वांचे‎ मोबाईल कॉल डिटेल्स, बोटाचे ठसे‎ याचे अवलोकण केले. तसेच‎ सर्वांच्या हालचालीवर बारिक नजर‎ ठेवली. यामुळे सुनेने दागिने‎ चोरल्याचे समोर आले.‎

बातम्या आणखी आहेत...