आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास‎:गुणवत्तेत ठसा, काटगावच्या शाळेला ‘समग्र शिक्षा’राज्यस्तरीय पुस्तिकेत स्थान‎, राबवले कल्पक उपक्रम

धाराशिवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिकुलतेवर मात करत विद्यार्थ्यांना‎ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या राज्यातील विविध‎ शाळांची माहिती असलेली प्रेरणादायी संग्रह‎ पुस्तिका महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने‎ प्रकाशित केली आहे. यात तुळजापूर‎ तालुक्यातील काटगाव येथील जिल्हा परिषद‎ शाळेला स्थान मिळाले आहे. येथील‎ शिक्षकांनी शैक्षणिक उपक्रमांतून राज्यस्तरावर‎ शाळेचा ठसा उमटवला आहे.‎

समग्र शिक्षा अभियानातून ‘गुणी शिक्षक,‎ गुणवंत शाळा’ नावाची पुस्तिका शिक्षण‎ परिषदेने नुकतीच प्रकाशित केली. राज्यपाल,‎ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण‎ मंत्र्यांसह राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे‎ यांनी या उपक्रमाचे केले. राज्यातील निवडक‎ ३५ सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद शाळांना या‎ पुस्तिकेत स्थान दिले. काटगाव शाळेने‎ राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा‎ सर्वांगीण विकास झाल्याचे आढळल्याने‎ शाळेची निवड झाली.

शाळेचे मुख्याध्यापक‎ भीमाशंकर सकपाळे यांनी शाळेची माहिती‎ पुस्तिकेत दिली. उपक्रमशील शिक्षिका रंजना‎ स्वामी, राजेंद्र लोहार, शुभांगी बडूरे, कृष्णाथ‎ भास्करे, राजाभाऊ क्षीरसागर, एकनाथ नैताम,‎ अंजली कासार, शीतल होमकर, सारिका‎ कदम यांच्या परिश्रमामुळे शाळा क्रमांक एकवर‎ आहे.‎ ‎ शालेय समितीचे सहकार्य‎ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी‎ बेटकर, उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे व‎ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे शिक्षकांना‎ नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी बळ मिळते.

मंगरूळ‎ बीटचे विस्ताराधिकारी मल्हारी माने, केंद्रप्रमुख‎ संजय वाले यांनीही शिक्षकांना प्रोत्साहित केले.‎
शाळेतील शिक्षकांची मेहनत‎ पाहून नागरिकांकडून शाळेला‎ मदत मिळते. शिक्षकांनी‎ ग्रंथालयासाठी आर्थिक‎ मदतीची मागणी केल्यावर‎ तब्बल एक लाख रुपये वर्गणी‎ संकलित झाली. ज्ञानवर्धक‎ पुस्तके आणून विद्यार्थ्यांना‎ वाचण्यासाठी उपलब्ध‎ करण्यात आली. तसेच‎ विद्यार्थी भाषण, निबंध स्पर्धा‎ आणि महापुरुषांच्या माहितीचे‎ लेखन करण्यासाठीही या‎ पुस्तकांचा वापर करतात.‎

किरकोळ साहित्याचा उपयोग‎

खडे, माती, मणी, चिंचोके, बिया, काड्या, अंक‎ कार्ड, शब्द पट्ट्या आदी साहित्याचा उपयोग करून‎ विद्यार्थ्यांना गणित, वाचन, एकाग्रता निर्माण‎ करण्यास शिकवले जाते. धुळपाटी, शब्द कार्ड,‎ चार्टही प्रत्येक घरात लावले आहेत.‎ एक तास मोबाइलचा‎ कोरोनात विद्यार्थी मोबाइलशी जोडले गेले. आता‎ दर शनिवारी एक तास मुलांना मोबाइलचा वापर‎ करण्याची मुभा दिली जाते.

यातून दीक्षा ॲप, रीड‎ टू मीटॲप, शिकू आनंदे असे उपक्रम वापरून‎ विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडली जाते.‎ वुई मीट बाय गुगल मीट कोरोना काळात हा‎ उपक्रम शिक्षकांनी राबवला. यामध्ये गुगल मीटच्या‎ माध्यमातून दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांशी संपर्क‎ ठेवण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक‎ प्रवाहात व त्यांच्या घरात शैक्षणिक वातावरण‎ ठेवण्यात यश आले.‎

आनंददायी शनिवार‎

प्रत्येक शनिवारी परिपाठाच्या वेळी कार्यानुभव,‎ कला संबंधित घटक घेण्यात येतात. गोष्ट‎ स्वतःच्या भाषेत कथन करण्याची संधी विद्यार्थ्यांना‎ देण्यात येते. बडबड, कृतीयुक्त गीतांते गायन‎ केल्यानेही व्यक्तिमत्व विकासास मदत झाली.‎ सांस्कृतिक कला महोत्सव‎ सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केले‎ जाते. नृत्य, नाटिका, चित्रपट गीते, प्रबोधनात्मक‎ भारुड, कव्वाली आदी बसवले जातात.‎ विद्यार्थ्यांमधील कलागुणांच्या सादरीकरणाची‎ संधी दिली जाते.‎