आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री पीकविमा योजनेस (२०२२-२३) ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे विमा हप्ता भरुन पीक संरक्षित करण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत विमा काढून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. योजनेंतर्गत खरीप ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा विमा काढता येणार आहे. पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पेरणी, लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा समावेश राहणार आहे.
यात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी असे घटक आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून (नैसर्गिक कारणे व आपत्तीने नुकसान, ) ७२ तासांच्या आत विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी विभाग व महसूल विभागाला सूचना देणे गरजेचे आहे. दरम्यान, अनेक भागातील शेतकरी विमा भरण्यासाठी मुदत वाढून देण्याची मागणी करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.