आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पालिकेला पत्र, वेधले नागरी समस्यांकडे लक्ष‎

उमरगा‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पाणीपुरवठा, सांडपाणी, कचरा,‎ सार्वजनिक स्वच्छतागृह व महिलांसाठी‎ स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध‎ नाही. रोडवर मोकाट जनावरांची गर्दी होते,‎ आदी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी‎ अॅड. शीतल फाउंडेशनने तीन महिन्यांपूर्वी‎ पालिकेला निवेदन दिले होते. परंतु त्यातील‎ काही समस्या तात्पुरत्या सोडवण्यात‎ आल्या आहेत, अनेक प्रश्नी पालिकेने‎ कोणतीच कारवाई केली नाही.

त्यामुळे‎ फाउंडेशनच्या वतीने पालिका प्रशासनाला‎ स्मरणपत्र देण्यात आले.‎ पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या‎ स्मरणपत्रात म्हटले आहे की, शहरात‎ सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने‎ बाहेरगावातून शहरात खरेदी, विविध‎ कार्यालये व न्यायालयात कामानिमित्त‎ येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे‎ महिलांची गैरसोय होत आहे.

पालिकेने‎ यापूर्वी सांगितले होते की, लातूर येथील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एका कंपनीला कंत्राट दिले असून‎ लवकरच सर्वेक्षण करून स्वच्छतागृह‎ उभारणी सुरू करणार. परंतु अद्याप‎ स्वच्छतागृहांचे काम सुरू झाले नाही.‎ तसेच हमीद नगर, काळे प्लॉट व गणू‎ डॉक्टर प्लॉट परिसरात नियमित व मुबलक‎ पाणीपुरवठा होत नसल्याने येथील‎ नागरिकांची गैरसोय होत आहे. या‎ भागातील बहुतांश नागरिक हे काबाडकष्ट‎ करणारे आहेत. नळाला पाणी आले नाही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तर हातपंप, बोअरवरून रात्री-बेरात्री पाणी‎ भरण्याचा अतिरिक्त ताण येथील‎ नागरिकांवर पडत आहे. स्मरण पत्रावर‎ ॲड. ख्वाजा शेख, ॲड. अर्चानाताई‎ जाधव, लईखाँ औटी, प्रदीप चौधरी,‎ व्यंकटराव भालेराव, राजू बटगिरे, अखिल‎ शेख, मुसा उस्ताद, फारुख शेख, एस. बी.‎ गायकवाड, फारुख शेख, चिदानंद स्वामी,‎ अशोक कांबळे, रवी सांगवे, माधव माने‎ आदींच्या स्वाक्षरी आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...