आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानभरपाई‎:विमा कंपनीकडून‎ सोयाबीन शेतकऱ्याला‎ अत्यल्प नुकसानभरपाई‎

तेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामात अतिवृष्टीने‎ झालेल्या सोयाबीन पिकांची‎ नुकसानीची तुटपुंजी रक्कम‎ शेतकऱ्यांना देऊन विमा कंपनीने‎ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ‎ चोळण्याचा संतापजनक प्रकार‎ पहावयास मिळत आहे तेर‎ ता.धाराशिव येथील शेतकरी‎ तुकाराम तात्याबा आबदरे यांची‎ म्होतरवाडी शिवारात गट न.२५०‎ मध्ये ७० आर जमीन आहे. या‎ जमिनीत आबदरे यांनी खरीप हंगाम‎ २०२२मध्ये सोयाबीन पिकाची पेरणी‎ केली होती.

निसर्गाचा लहरीपणा‎ लक्षात घेऊन त्यांनी आपले पीक‎ प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत‎ एँग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडे‎ ७५४ रूपये ६० पैसे विमा हप्ता भरून‎ पीक संरक्षित केले होते. परतीच्या‎ पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान‎ झाले म्हणून त्यांनी नुकसानीची‎ आॅनलाईन तक्रार केली. पण १८३२‎ रूपये भरपाई मिळाली.‎

बातम्या आणखी आहेत...