आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎परिणाम:कमी मजुरी, दोन वेळ हजेरी; महिन्यात‎ साडेपाच हजारांनी घटले रोहयोचे मजूर‎

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभरापूर्वी जिल्ह्यात महात्मा गांधी‎ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या‎ कामावर आठ हजार मजूर काम करत‎ होते. तसेच ३५० ग्रामपंचायतीत ८००‎ पेक्षा अधिक कामे सुरु होती. मात्र,‎ एकीकडे २५६ रुपये मिळणारी हजेरी,‎ दुसरीकडे शेतीचे वाढते कामे, त्यात‎ मिळणारी जास्तीची मजुरी त्याच‎ बरोबर शासनाने रोहयोच्या सार्वजनीक‎ कामांवर केलेली दोन वेळची‎ ऑनलाइन हजेरी, यामुळे ३० दिवसात‎ तब्बल पाच हजार ४०६ मजूर‎ घटल्याचे दिसून आले. त्यामुळे सध्या‎ १३१ ग्रामपंचायतीत ४६० कामांवर‎ केवळ दोन हजार ५९४ मजूर कार्यरत‎ असल्याचे दिसून आले.‎ जिल्हा व राज्यात रोजगार हमी‎ योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात‎ भ्रष्टाचार होत आहे. त्याच्या तक्रारीही‎ होत असताना शासनाने यात अधिक‎ पारदर्शकता निर्माण करण्यासाठी‎ सार्वजनीक कामांवरील मजुरांना दोन‎ वेळ ऑनलाइन हजेरी देणे अनिवार्य‎ केली. त्याचा स्थानिक पातळीवरील‎ प्रशासनाने धसका घेतल्याने मोठ्या‎ प्रमाणातील कामे बंद पडली.

विशेष‎ म्हणजे सार्वजनीक कामांची संख्या‎ घटली आहे. वैयक्तिक कामे मात्र सुरू‎ आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या काही प्रमाणात का होईना कामे आणि‎ मजूर काम करत असल्याचे दिसून येत‎ आहेत. जिल्ह्यात मागील दोन- तीन‎ महिन्यात रोहयोच्या कामावरील‎ मजुरांची संख्या दहा हजारावर गेली‎ होती. तसेच ग्रामपंचायत संख्या आणि‎ कामांची संख्याही अधिक होती. पण,‎ शासनाच्या नियमामुळे मोठ्या प्रमाणात‎ मजुरांची संख्या कमी होत चालली‎ आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात‎ स्थानिक स्तरावर सुरू असलेला‎ मजूरांच्या संख्येबाबत बनावटपणा‎ उघडकीस येणार असून या‎ उपाययोजनांमुळे बोगस कामांना काही‎ प्रमाणात आळाही बसत आहे.‎

दुष्काळात हजारो ग्रामस्थांना रोजगार‎
रोहयोतून शासनाने मागेल त्याला काम, म्हणजे ज्यांना‎ आवश्यक आहे, आशा मजुरांच्या हाताला काम देण्याचे‎ नियोजन केले होते. तसेच जेथे काम आवश्यक आहे, तीच‎ कामे करण्यात येत होती. त्यामुळे ऐन दुष्काळात हजारो,‎ लाखो लोकांना रोजगार मिळाला होता. आता मात्र, त्यात‎ अनेकांनी कामे आणि मजूर खोटी दाखवत पैसे लाटण्याचे‎ काम केल्याचे दिसून येत आहेत.‎

रोहयोच्या कामात स्थानिक स्तरावर घोटाळे‎
रोहयोच्या कामांमध्ये स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात‎ घोटाळे होत असतात. नुकताच उस्मानाबाद पंचायत‎ समितीत असे घोटाळे उघड झाले आहेत. स्थानिक‎ पातळीवर ही कामे करायची असल्याने यात अनेकदा मजूर‎ दाखवून यंत्राच्या मदतीने कामे उरकून घेण्यात येतात. तसेच‎ अनेक कामे न करतानाही कामे झाल्याचे भासवण्यात‎ येतात. त्यामुळे अशा कामांवर आता अंकुश आले आहेत.‎ या प्रकारामुळे योजनेचा उद्देशच हरवला आहे. त्यामुळे‎ ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे.

बांधकाम, शेतीवर रोहयोपेक्षा अधिक मजुरी‎
रोहयोच्या कामांवर केवळ २५६ रुपये मजुरी मिळत असते.‎ दुसरीकडे बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना ४०० ते ६००‎ रुपये मजुरी दिली जाते. तसेच शेतीच्या कामावर ३०० ते ४००‎ रुपये मजुरी मिळत असते. त्यामुळेही रोहयोच्या अनेक‎ कामांवर मजूर उपलब्ध होत नसतात. असे असले तरी,‎ ग्रामपंचायतच्या अनेक हजेरी बुक मध्ये मोठ्या प्रमाणात मजूर‎ असल्याचे दिसून येत होते. त्याची संख्या आता घटली.‎

बातम्या आणखी आहेत...