आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम झाली होती. त्यात १६६ ग्रामपंचायत सदस्य आणि ९४ विविध विकास सोसायटीच्या सदस्यांचा समावेश नव्हता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन निवड झालेल्या ग्रामपंचायत, सोसायटी सदस्यांचा समावेश करुन नव्याने मतदार यादी तयार करुन ३० एप्रिलपर्यंत या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी सहकार प्राधिकरणाच्या आदेशानुसार मतदार यादी अंतिम करुन नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार होते.
मात्र, तत्पूर्वी उच्च न्यायालयात या प्रकरणाबाबत ज्या सोसायटी व ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने त्यांना मतदान करणे शक्य नव्हते. त्यामुळे या सदस्यांची निवड झाल्यानंतरच निवडणुका घेण्याची याचिका न्यायालयात होती. बाजार समितीचे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पुर्वेसंध्येला न्यायालयाने या निवडणुकांना स्थगिती दिली होती.
पाच जानेवारी रोजी अंतिम निकाल देत नवीन सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा मतदार यादीत समावेश करुन ३० एप्रिलपूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश दिले. सहकार आयोगाकडून नव्याने निवडणुक कार्यक्रम जाहीर करुन ही निवडणूक होणार, असे सहाय्यक निबंधक सुनील शिरापूरकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.