आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यायाल्याने तत्कालीन परिस्थितीत शासन-प्रशासनाने सोयीनुसार नियम करत चुकीच्या पद्धतीने नवीन सरकार स्थापन केले. या सर्व बाबी न्यायालयाने समोर आणून दिल्या आहेत. त्यानंतरही खोके सरकार कायम असल्याचे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केले.
याबाबत आमदार कैलास पाटील यांनी जनतेच्या न्यायालयावरच आमचा विश्वास आहे. सरकारने राजीनामा देऊन मैदानात यावे, असे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये आमच्या पक्षाला दिलासा मिळाला आहे. तसाच जनतेच्या न्यायालयात आम्हालाच न्याय मिळणार असल्याचा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आजच्या निर्णयाने शिंदे सरकारला काही दिवस पदावर राहता येणार असले तरी हा आनंद क्षणभंगुर आहे. मुळ पक्षाला म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रतोदला अधिकृत मान्यता न्यायालयाने दिल्याचे स्पष्ट केले. ‘प्रतोद चुकीचा, त्यांनी काढलेला व्हीप चुकीचा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर ते परत मुख्यमंत्री बनले असते’.
म्हणजे या वाक्यातून असं जाणवत की या आधीच्या ज्या काही कारवाया झाल्या त्या नैतिकतेला धरून नाहीत. सरकारकडे नैतिकता शिल्लक असल्यास सरकारने राजीनामा देऊन पायउतार व्हावे. अन्यथा जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतःच न्याय करेल, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.