आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशासनाच्या सुचनेप्रमाणे पारधी समाज चालला तर त्यांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही आणि राज्यात इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही असे मत पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी तेरखेडा येथिल लक्ष्मी पारधि वस्तीवरील आयोजीत बैठकीमध्ये व्यक्त केले. लक्ष्मी पारधी वस्तीवर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध योजनेसह विविध योजनेसाठी लागणारी कागदपत्रे व माहितीसाठी पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पारधी समाजाच्या व्यक्तींनीही छोटे मोठे उद्योग सुरु करुन धंदा, व्यवसाय करावा यासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पुढाकार घेत प्रारंभ केला त्यांच्याकडून माहिती घेत उपस्थितांना विविध शासकीय योजनांची माहिती देत वस्तीतंर्गत रस्ते,घरकुल,जात प्रमाणपत्र,आधार,लहान मुलांच्या शिक्षणासाठी आश्रम,अंपगाच्या योजना,महिलांसाठी छोटे-छोटे उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन शिबीर,विविध कोर्सेस आदिंची माहीती दिली.
कागदपत्रे काढण्यासाठी कॅम्प आयोजित करुन पुढील दोन ते तीन महिन्यापर्यं लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले.यावेळी कळंब उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश,सपोनि दिनकर गोरे,तलाठी,ग्रामसेवक ,महा-ई सेवा केंद्राचे प्रतीनिधि, अधिकारी,रेशन दुकानदार यांच्यासह पोलिस अधिकारी व अंमलदार,पारधी समाजाचे लोक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.