आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:आता कमी करा टेन्शन, देऊन टाका पेन्शन

धाराशिव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"आता कमी करा टेन्शन, देऊन टाका पेन्शन, नाहीतर‎ जवळ आलेय इलेक्शन'', "शिक्षक, पदवीधर मतदारसंघ‎ झांकी है, २०२४ अभी बाकी है'', अशा घोषणातून‎ सरकारला इशारा देत जिल्हाभरातील कर्मचारी‎ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मंगळवारी‎ (दि.१४) शहरात काढलेला मोर्चा आतापर्यंतचा‎ शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा मोर्चा ठरला.‎ आयोजकांनी केलेल्या दाव्यानुसार जिल्हाभरातून‎ मोर्चात सुमारे १५ हजार महिला, पुरूष कर्मचारी, शिक्षक‎ सहभागी झाले. मोर्चात कर्मचाऱ्यांच्या जवळपास ४२‎ संघटना सहभागी झाल्या. जुनी पेन्शन योजना लागू‎ करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय‎ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. याला‎ जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.

आंदोलनाची‎ सुरुवात जोरदार मोर्चा काढून केली. श्री तुळजाभवानी‎ क्रीडा संकुलापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाला‎ इतकी गर्दी होती की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे‎ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतरही‎ स्टेडियममधून मोर्चेकऱ्यांच्या रांगा बाहेर पडत होत्या.‎ सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संथ गतीने‎ सरकत होते. स्टेडियमपासून तेथे पोहचण्यासाठी‎ आंदोलकांना दीड तासांचा अवधी लागला.‎ मोर्चेकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी‎ केली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर‎ मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मोर्चात आरोग्य, महसूल,‎ जिल्हा परिषद, शिक्षण, बांधकाम, राज्य शासकीय‎ कर्मचारी, जलसंपदा, अंगणवाडी, उमेद, भूमी‎ अभिलेख आदींसह सर्व विविध विभागातील कर्मचारी‎ सहभागी झाले.‎ भाजपला थेट इशारा : शिक्षक व पदवीधर मतदारसंघ‎ निवडणुकीत भाजप आघाडीच्या उमेदवारांना पराभव‎ पत्करावा लागला. आगामी २०२४ मध्ये पराभव‎ टाळायचा असेल तर जुनी पेन्शन‎ लागू करा, अशा इशारा वक्त्यांकडून‎ देण्यात येत होता. मोर्चानंतर‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर‎ झालेल्या सभेत भाषण करणाऱ्या‎ अनेक पदाधिकाऱ्यांचा रोख २०२४‎ च्या निवडणुकांवरच होता.‎ जुन्या पेन्शनसाठी पहिल्यांदाच‎ एल्गार‎ आतापर्यंत जुन्या पेन्शनसाठी‎ कोणत्याही संघटनेने इतक्या गांभीर्याने‎ आंदोलन केले नाही.

उलट जुनी‎ पेन्शन संघर्ष समितीच्या कर्मचाऱ्यांना‎ सोबत घेऊन अन्य मागण्यांसाठी‎ आंदोलन करण्यात आले. अन्य‎ मागण्या पदरात पाडून घेतल्यावर‎ जुन्या पेन्शनच्या मागणीचा प्रत्येक‎ आंदोलनात विसरच पडत गेला. परंतु,‎ यावेळी जुन्या पेन्शनची योजना‎ प्राधान्याने पुढे करण्यात येत आहे.‎शासकीय कार्यालयामध्ये केवळ‎ अधिकारीच‎ शासकीय कार्यालयामध्ये केवळ‎ अधिकारीच होते. वर्ग दोन, तीन व‎ चारचे सर्व कर्मचारी संपात सहभागी‎ झाल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प‎ झाले. ग्रामीण भागातील नागरिकांना‎ मोर्चाची माहिती असल्यामुळे पहिल्या‎ दिवशी काही ताण पडला नाही. मात्र,‎ तहसील कार्यालयात विविध महसुली‎ प्रकरणांच्या सुनावण्या झाल्या नाहीत.‎

याचा शेतकऱ्यांना मात्र, विनाकारण‎ भुर्दंड बसला.‎शिक्षकांमध्ये पहिल्याच दिवशी‎ फूट मोर्चात अनेक शिक्षक नेते‎ सहभागी झाले होते. यातील अनेक‎ नेत्यांनी जोषात भाषण ठोकत सर्व‎ शिक्षक संपात सहभागी झाल्याचे‎ सांगण्यात येत होते. मात्र, १२ वीची‎ परीक्षा सर्व २० केंद्रांवर सुरळीत पार‎ पडली. यामध्ये ६६ पर्यवेक्षक, २०‎ रनर, २० केंद्रप्रमुख तसेच १० मुख्य‎ पर्यवेक्षक केंद्रावर हजर होते.‎

संबळाच्या तालावर धरला ठेका‎
मोर्चात अनेक कर्मचारी हलगी, संबळ घेऊन पारंपरिक वेशभूषेत‎ सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनीही हलगीच्या तालावर ठेका धरला. अनेक‎ कर्मचारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारीही हलगीच्या तालावर नृत्य‎ करत होते. शासकीय कार्यालयात रूक्षपणे काम करणाऱ्या अनेक‎ कर्मचाऱ्यांनी मोर्चामध्ये नृत्याचा आनंद लुटला.‎

नर्स, डॉक्टरांचा संप, रुग्णांची गैरसोय‎
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह नर्स, डॉक्टर‎ संपात सहभागी झाल्यामुळे उपचारासाठी दाखल‎ झालेल्या रुग्णांची गैरसोय झाली. त्वचारोग तज्ञासह‎ इतर डॉक्टर दालनात नसल्याने अनेक रुग्णांना‎ उपचार मिळाले नाहीत. केस पेपर काढण्याच्या‎ ठिकाणी कोणीच नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या‎ नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. अनेक रुग्णांनी‎ डॉक्टर कधी येणार याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा‎ केली. मात्र, संप असल्याने येथे कोणीच नसल्याचे‎ सांगितले. तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयातील‎ कर्मचारीही संपात सहभागी झाले. मात्र, रुग्णांची‎ गैरसोय टाळण्यासाठी तेथील काही डॉक्टरांनी स्वत:‎ प्रिस्क्रिप्शन देऊन रुग्णांना औषध गोळ्या दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...