आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात नाईचाकूर येथे कृषी पंपाला महावितरणकडून ४८ तासातील केवळ आठ तासच विद्युतपुरवठा वाढवून तो दहा तास सोडण्यात यावा यासाठी कृषी पंपधारक व ग्रामस्थांनी महावितरण उपकार्यकारी अभियंता राजेंद्र शेंडेकर यांना निवेदन देवून केली आहे.नाईचाकुर ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थकित कृषीपंपाचे विज बिलात सूट दिल्याने नाईचाकूर येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षी ६५ लाख रुपये भरणा केला.
तालुक्यातील नाईचाकूर येथील शेतकऱ्यांनी सर्वाधिक भरणा महावितरणकडे केला असताना गावाला दोन दिवसाआड आठ तास लाईट मिळत आहे. तालुक्यातील सर्वाधिकओलिताखाली क्षेत्र असलेल्या गावाला एक दिवसाआड विज पुरवठा होत असल्याने हाता तोंडाशी आलेले सोयाबीन माती मोल झाले. यावेळी आमदार चौगुले यांनी शेतकऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून नाईचाकूर येथील विजेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल. ३३ केव्ही सबस्टेशन मंजूर झाले असून तात्पुरता उपाययोजना म्हणून दोन दिवसात पर्याय काढला जाईल असे आश्वासन दिले.
पूर्तता न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी मशागत करून रब्बीची पेरणी करण्यासाठी सुरुवात केल्याने एक दिवसाआड तेहि आठ तास विज सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता शेंडेकर व उपअभियंता गोपाळ जोशी यांना निवेदन देवून दररोज वीज पुरवठा मिळवून देण्याची विनंती केली असता श्री शेंडेकर यांनी शेतकऱ्यांना दररोज लाईट दिली जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर आश्वासनाची पूर्तता न झाल्यास नाईचाकूर येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.