आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारभाव वधारेना‎:कमी दरामुळे साठवला कांदा, अवकळीने सडला‎; दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका‎

समाधान डोके | ईट‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागाील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या‎ वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कांदा‎ उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.‎ दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवलेला कांदा‎ पावसामुळे भिजून सडला आहे. यामुळे अनेक‎ शेतकऱ्यांना हा कांदा उकिरड्यावर फेकण्याची‎ वेळ आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून‎ कांद्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी‎ मेटाकुटीला आले आहेत.‎ यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे‎ पाणी पळाले. आडतीवर कांदा नेला तर‎ शेतकऱ्यांना भाड्यासाठी स्वत:च्या खिशातून‎ खर्च करावा लागल्याची अनेक उदाहरणे‎ आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शक्यतो‎ दरवाढीसाठी प्रतीक्षा करण्याचे ठरवले होते.‎

यामुळे शेतातच कांदा साठवण्यात आला होता.‎ काहींनी कांदाचाळीत तर काहींनी तात्पुरते शेड‎ तयार करून कांदा साठवला होता. गेल्या काही‎ दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस,‎ गारपिटीने थैमान घातले आहे. मार्च, एप्रिल व मे‎ मध्येही अवकाळी पाऊस झाला. याचा फटका‎ फळपिकांना बसला. यात कांदा उत्पादकही‎ भरडल्या गेले आहेत. पावसामुळे त्यांनी‎ साठवलेला कांदा जागेवरच सडला आहे.‎ यामुळे शेतकऱ्यांना कांदा उकिरड्यावर‎ फेकण्याची वेळ आली आहे.‎ ‎ ‎

कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ४० ते‎ ५० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना आला‎ आहे. यात शेती तयार करणे, लागवड करणे,‎ बियाणे, खते, औषधी फवारणी, खुरपणी‎ काढणी आदींचा समावेश आहे. असा खर्च‎ झालेला असताना शेतकऱ्यांना मात्र लावलेला‎ खर्चही निघणे अवघड झाले आहे. यामुळे‎ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.‎‎

दीड एकरात उन्हाळी कांद्याची लागवड केली.‎ खरिपात झालेल्या नुकसानीची कसर उन्हाळी‎ कांद्यातून निघेल, अशी आशा होती. मागील तीन‎ दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे‎ अर्ध्या एकरातील कांदा शेतातच सडला आहे. नफा‎ तर दूर झालेला खर्चही खिशातून देण्याची वेळ आली‎ आहे.

-सयाजी डोके, कांदा उत्पादक.‎

नफा दूर, खर्चही खिशातूनच‎

मागील वर्षी कांदा पिकाला प्रतिक्विंटल दीड हजार ते‎ दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, यंदा‎ कांदा दरात मोठी घसरण झाली असून, ३०० ते ४००‎ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी‎ अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला‎ आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करूनही भाव‎ वधारण्याचे नाव नाही.‎