आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाज घडविण्यासाठी आज महाराष्ट्रातातील वारकरी संप्रदाय अहोरात्र झटत आहे.आपल्या समाज प्रबोधनातून साधू संत स्वतःला काही मागत नाहीत तर समाजासाठी देवाकडे मागणे मागतात असे प्रतिपादन किर्तनकेसरी ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे यांनी केले. धाराशिव तालुक्यातील तेर येथे वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी यांच्या संस्थेतील आजी माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनरूपी सेवेत साखरे महाराज बोलत होते.साधू संत देवाला मागणी मागायला मंदिरात जात नाहीत.
भक्तीच्या जोरावर देवच आपल्या घरी बोलाविण्याची ताकद संतामध्ये आहे,असेही विचार त्यांनी आपल्या निरूपणात मांडले. यावेळी ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी यांचा आजी माजी विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी अरूण महाराज कदम,गोविंद महाराज पांगरकर धनंजय पुजारी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.