आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शहरातील कुमारस्वामी प्राथमिक विद्यामंदिरात शनिवारी (४) द्वितीय सत्रातील विशेष पालक मेळावा झाला. मुख्याध्यापक कविराज रेड्डी अध्यक्षस्थानी होते. यावेळी पालक राम लोहार, संध्या इंगळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते. मुख्याध्यापक रेड्डी यांनी प्रास्ताविकात विविध शासकीय योजना, सहशालेय उपक्रम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पालकांनी शाळेला सहकार्य करावे,शाळेत देण्यात आलेल्या अभ्यासाची पुनरावृत्ती व सराव घ्यावा असे आवाहन केले.
विद्यार्थी स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणा व्हावी यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात शाळेत विशेष प्राविण्य वर्ग सुरु करण्यात येणार आहेत असे ते म्हणाले. यावेळी पालकांनी आपल्या पाल्याविषयी शिक्षकाबरोबर चर्चा करून शैक्षणिक उणीव पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते, त्यात विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यात यावा असे आवाहन केले. शिक्षक प्रतिनिधी ब्रह्मानंद गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी स्वच्छ गणवेश,शाळेची शिस्त, नीटनेटकेपणा व वेळेचे नियोजन याविषयी मार्गदर्शन केले. तर सहशिक्षिका शोभा भुसार यांनी आपले विचार मांडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.