आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव तर उसाला तीन हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख भाई गंगाभिषण थावरे यांनी केली. तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथे शुक्रवारी उस परिषदेत ते बोलत होते. उस परिषदेपूर्वी गावात मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. फुले पिंपळगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख भाई गंगाभीषण थावरे ऊस यांच्या नेतृत्वाखाली उस परिषद घेण्यात आली. या उस परिषदेत भाई गंगाभिषण थावरे यांनी बोलताना केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे, शेती आज परवडत नसून शेतकन्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव दिला पाहिजे असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.