आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी ४ वर्षावरुन २ वर्षांवर आणण्यासाठी सुधारीत आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या.राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी ४५२.४६ कोटींच्या निधीस नुकतीच मंजुरी दिली.
या रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्व्हे झाला असून त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील नऊ व तुळजापूर तालुक्यातील १५ गावातील ४९४.२६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यावर शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर घेण्याचा निर्णय जाहीर केल्याचे सांगितले. भू-संपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता प्रदीप बनसोडे, सहा कार्यकारी अभियंता राजनारायण, नुरुस सलाम, उपाधीक्षक भूमी अभिलेख माने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना योग्य मोबदला
शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना दिला. भू-संपादनानंतर काम पूर्ण करण्यासाठीचा नियोजित कालावधी ४ वर्षाचा असल्याचे उप मुख्यअभियंता प्रदीप बनसोडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.