आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ५५२ पेक्षा जास्त अधिक उमेदवार पोलिस भरतीची तयारी करत असून ग्रामीण भागातून शहरात येऊन भरतीचे मैदान मारण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे पोलिसांच्या यावेळी उस्मानाबाद मध्ये जागा नसल्याने येथील उमेदवारांना मुंबई-पुण्यासह लातूर, सोलापूर, नाशिक व अन्य जिल्ह्यात जाऊन परीक्षा देण्याची वेळ आली असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे अनेकांची परवड होत असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातून शहरात येऊन विविध अॅकॅडमी तसेच स्वत: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यात पोलिसांच्या जागा भरण्यात येत असल्या तरी, उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा एकही पोलिस भरतीसाठी जागा नसल्याने स्थानिक उमेदवारांना बाहेर जिल्ह्यात जाऊन परीक्षा देण्याची वेळ आली आहे. यातही सर्वाधिक जागा मुंबईत असल्याने तेथे जाऊन परीक्षा आणि मैदानी कसरत करण्याची तयारी इच्छुकांनी सुरु केली आहे.
शहरातील नगर परिषदेच्या शाळेच्या मैदानासह श्री तुळजाभवानी क्रीडा संकूल, बार्शी रस्त्यावरील मैदानासह शहरातील विविध मैदानावर हे उमेदवार तयारी करत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. मुलींचीही संख्या अधिक आहे.
जिल्ह्यात पोलिसांच्या रिक्त जागाच नाही
यंदा जिल्ह्यात पोलिस भरती होणार नसल्याने आम्ही मुंबई - पुण्याचे अर्ज भरले आहेत. त्यामुळे आता जेंव्हा तिथली परीक्षा होईल, तेंव्हा तेथे जाऊन आम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणात शहरात ग्रामीण भागातून उमेदवार येऊन तयारी करत आहेत. -महेश वाघ, परीक्षार्थी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.