आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:9 हमीभाव केंद्रांवर हरभऱ्याची नोंदणी‎ सुरू, शासन आदेशानंतर होणार खरेदी‎

धाराशिव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव‎ मिळण्यासाठी शासनाने जिल्ह्यातील‎ ९ हमीभाव खरेदी केंद्रांवर‎ हरभऱ्याची नोंदणी सुरू केली आहे.‎ शासन आदेशानंतर खरेदी करण्यात‎ येणार आहेत. हमीभावाने (५३३५‎ रुपये क्विंटल) हरभऱ्याची विक्री‎ करण्यासाठी जवळच्या हमीभाव‎ केंद्रावर नोंदणी करावी, असे‎ आवाहन जिल्हा पणन अधिकारी‎ मनोज बाजपे यांनी केले आहे.‎ धाराशिव जिल्ह्यातील मार्केटिंग‎ फेडरेशनचे नऊ खरेदी केंद्र सुरू‎ झाले. आडत बाजारात हरभऱ्याला‎ कमी भाव मिळत असल्याने‎ शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत‎ होती.

हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत‎ नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी‎ बेभावाने हरभऱ्याची विक्री केली,‎ उर्वरित शेतकऱ्यांना योग्य भाव‎ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी‎ जवळच्या हमीभाव केंद्रावर रितसर‎ नोंदणी करणे आवश्यक आहे.‎ शेतकऱ्यांचा हरभरा शासकीय‎ हमीभाव खरेदी केंद्रावर ५३३५ रुपये‎ प्रति क्विंटलने खरेदी करण्यात येणार‎ असून नोंदणी करण्यासाठी ई -पीक‎ पाहणी केलेला ७/१२, आठ-अ,‎ बँक पासबुक व आधार कार्डसह‎ शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर भेट‎ देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.‎ ज्या शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी‎ केंद्रावर हरभऱ्याची विक्री करायची‎ आहे, त्यांनी ऑनलाइन नोंद करावी.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ज्या शेतकऱ्यांची नोंद होणार नाही,‎ त्यांचा हरभरा खरेदी केला जाणार‎ नाही, असे सांगण्यात आले.‎

या केंद्रांवर नोंदणी सुरू‎
धाराशिव तालुक्यात धाराशिव‎ खरेदी विक्री संघ, कळंब येथे एकता‎ सहकारी संस्था, वाशी खरेदी विक्री‎ संघ, भूम खरेदी विक्री संघ, ईट येथे‎ तनुजा महिला सहकारी संस्था,‎ तुळजापूर खरेदी विक्री संघ,‎ लोहाऱ्यात वसुंधरा अॅग्रो प्रोड्यूसर‎ कंपनी, उमरगा येथे स्वामी समर्थ‎ सहकारी संस्था, गुंजोटी विकास‎ सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने‎ हमीभावाने हरभऱ्याची खरेदी‎ करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...