आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपविभागीय पोलिस‎ अधिकाऱ्यांना साकडे‎:बाजार समिती आवारातील अतिक्रमण काढा‎

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती‎ आवारातील अतिक्रमण‎ काढण्याच्या मागणीसाठी‎ व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने‎ उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची‎ भेट घेऊन प्रश्न मांडला.‎ शिष्टमंडळ म्हणाले की,‎ व्यापाऱ्यांतून अनेक दिवसांपासून‎ अतिक्रमण काढण्याची मागणी होत‎ होती. सचिव दत्ता६य वाघ यांनी‎ यासाठी पुढाकार घेतला असता‎ अतिक्रमणधारकांनी सचिन वाघ‎ यांना धमकी दिली होती. त्यामुळे‎ व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी‎ आडत बंद ठेवून निषेध नोंदवला‎ होता. मात्र, अद्यापही अतिक्रमण‎ काढण्यात आलेले नाही.

त्यांनी‎ व्यापाऱ्यांनी उपविभागीय पोलिस‎ अधिकारी एम. रमेश यांची भेट‎ घेतली. भेटीत अतिक्रमण व‎ सततच्या चोऱ्यांबाबत चिंता व्यक्त‎ करण्यात आली. तसेच बाजार‎ समितीच्या आवारात गुन्हे प्रवृत्तीच्या‎ काही लोकांनी अतिक्रमण केले‎ आहे. त्यामुळे बाजार समिती‎ आवारातील अतिक्रमण काढले‎ नाही तर कोणताही व्यापारी शेतमाल‎ खरेदी करणार नाही.

बाजार बेमुदत‎ बंड ठेवण्यात येईल. परवानाधारक‎ परवान्याचे नूतनीकरण करणार नाही‎ अथवा नवीन परवाना काढणार‎ नाही, असेही निवेदनात म्हटले‎ आहे. निवेदनावर आडत व्यापारी‎ असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत‎ फाटक, भागवत पुरी, किरण जोशी,‎ लक्ष्मण कोल्हे, नंदकिशोर मोरे,‎ विजयचंद रुणवाल, निलेश‎ होनराव, गणेश लाखे, व्यापाऱ्यांच्या‎ स्वाक्षरी आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...