आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात असून यास महिलांचा देखील उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून महिलांसाठी विशेष योजना राबवीत आहे. अनेक मुलींना गावात माध्यमिक शाळेची सोय नसल्याने शाळेत जाण्यासाठी काही किलोमीटर पायपीट करावी लागते.
त्यामुळे त्यांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी माध्यमिक शाळेतील मुलींना सीएसआर माध्यमातून २००० सायकल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उमेद अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर धाराशिव, योजने अंतर्गत युवक-युवतींना रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह चालू व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अनेक महिलांनी या अंतर्गत प्रस्ताव दाखल केले असून स्वतःचे उद्योग देखील सुरू केले आहेत. उमेद गटातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा व अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना व्हावी यासाठी योजनांची माहिती पुस्तिका तयार करण्यात येत आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, अॅड.कल्पना निपाणीकर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. बलवीर मुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.