आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन‎:शरद पवारांनी आता एनडीएत यावे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करावे

धाराशिव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने नागालँडमध्ये‎ एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा‎ ‎ दिला. देशाच्या विकासासाठी‎ ‎ त्यांनी आता थेट एनडीएमध्ये‎ ‎ येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी‎ ‎ यांच्या नेतृत्वात काम करावे,‎ ‎ असे आवाहन केंद्रीय‎ ‎ सामाजिक व न्याय राज्यमंत्री‎ रामदास आठवले यांनी केले. तसेच त्यांनी‎ धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या नामांतराला‎ पाठिंबा व्यक्त केला.‎ दलित पँथर चळवळीतील दिवंगत नेते‎ यशपाल सरवदे यांच्या स्मरणार्थ आयोजित‎ शोकसभेत सहभागी होण्यासाठी राज्यमंत्री‎ आठवले शुक्रवारी धाराशिव येथे आले. या वेळी‎ त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांना‎ उद्देशून आवाहन केले.

या वेळी आरपीआयचे‎ (आ.) प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे,‎ जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ आदी उपस्थित‎ होते. राज्यमंत्री आठवले म्हणाले की, राहुल‎ गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पूर्ण खिळखिळी‎ झाली आहे. यामुळे आता शरद पवार यांनी‎ काँग्रेसला सोडून एनडीएमध्ये येण्याची गरज‎ आहे. आकडे पाहता आम्हाला शरद पवार यांची‎ गरज नाही. परंतु देशाचा विकास करण्यासाठी‎ पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने‎ आमच्यासोबत यावे, याचा आम्हास फायदाच‎ होणार आहे. पूर्वांचलामध्ये दोन जागा जिंकून‎ रिपाइंने खाते उघडले. महाराष्ट्रात मतदारसंघ‎ मोठे असल्याने अनेक अडचणी आहेत. मात्र,‎ एनडीएसोबतच राहून आम्ही महाराष्ट्रातही यश‎ मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान,‎ धाराशिव दौऱ्यावर जात असताना मंत्री रामदास‎ आठवले यांचा बीडमध्ये रिपाइंच्या पदाधिकारी‎ व कार्यकर्त्यांनी ५० फुटांचा हार घालून सत्कार‎ करण्यात आला.‎ आठवले म्हणाले की, धाराशिव व छत्रपती‎ संभाजीनगर नावाला आमचा पाठींबा आहे. अनेक‎ दिवसांपासूनची ही मागणी होती. ही मागणी मान्य‎ केल्याबद्दल आनंद वाटतो. जे राजकीय पक्ष याला‎ विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. तो‎ त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करावे, काय करू‎ नये, हे आम्ही कसे सांगणार. पण दोन्ही शहरांच्या‎ नामांतराला पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी‎ मांडली.‎

स्मारकासाठी पाच कोटी‎ कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद शाळेत डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार‎ करण्यासाठी पाच कोटी निधी उपलब्ध करून‎ देण्यासाठी प्रयत्न करू. स्थानिक प्रशासनाने तसा‎ प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा,‎ असेही आठवले यांनी म्हटले.‎ विराेध करण्यासाठी आंदाेलन‎

बातम्या आणखी आहेत...