आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:साहेब, आमच्या मुलांना शिकवा, नोकऱ्या द्या‎

कळंब‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहेब, ‘आमचा समाज मागासलेला‎ असून मुलांना शिक्षणाचे महत्त्व नाही.‎ आमच्या मुलांना शिकवा, नोकऱ्या द्या,‎ आम्हाला सन्मानाने जगायचे आहे’,‎ अशी विनवणी पारधी समाजबांधवांनी‎ पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी‎ यांच्याकडे केली.‎ पोलिस अधीक्षकांनी भटक्या‎ समाजाला मुख्य प्रवाहात‎ आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.‎ यासंदर्भात पोलिस अधीक्षक व‎ सहायक पोलिस अधीक्षक एस. रमेश‎ यांच्या अध्यक्षतेखाली कळंब पोलिस‎ ठाणे हद्दीतील पारधी समाजातील‎ लोकांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतले.‎ शिबिरात यापूर्वी प्रशिक्षण घेत‎ रोजगाराची संधी मिळालेल्या दोन‎ मुलांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले.‎

कार्यक्रमास प्रभारी पोलिस निरीक्षक‎ रवींद्र गायकवाड, जिल्हा विशेष शाखा‎ पोलिस निरीक्षक दासुरकर, कळंब‎ सपोनि अतुल पाटील, सपोनि कल्याण‎ नेहरकर, पोलिस उपनिरीक्षक रामहरी‎ चाटे, अमोल मालुसरे, वर्षा साबळे,‎ बाजार समितीचे सचिव वाघ,‎ सामाजिक कार्यकर्ता मनिषा वाघमारे व‎ पारधी समाजातील १०० ते १२५ व्यक्ती‎ हजर होते.‎

पोलिस अधीक्षकांनी‎ केले आश्वस्त‎
शिबिरात पारधी समाजबांधवांनी‎ पोलिस अधीक्षकांशी संवाद‎ साधला. ते म्हणाले की,‎ सन्मानाने जगण्यासाठी आमच्या‎ हाताला काम पाहिजे. मुलांना‎ चांगले शिक्षण पाहिजे. तसेच‎ ज्या मुलांनी शिक्षण घेतले आहे,‎ त्यांना नोकरी अथवा‎ लघुउद्योगासाठी मदत करावी.‎ पोलिस अधीक्षक अतुल‎ कुलकर्णी यांनी त्यांना‎ मदतीबाबत आश्वस्त केले.‎

तरूणाईला रोजगार, लघुउद्योग योजनांची माहिती
शिबिरात केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या दिनदयाल उपाध्याय‎ योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणींसाठी उपलब्ध असलेल्या‎ रोजगार संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या घरकुल,‎ स्वयंरोजगार, लघु उद्योगासंदर्भात वेगवेगळ्या योजनांबाबत माहिती देण्यात‎ आली. पारधी समाजातील बेरोजगार तरुण व तरूणींची नावे घेत त्यांना‎ प्रशिक्षण देण्याबाबत आश्वासित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...