आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणा अलर्टवर:धाराशिवसह राज्यातील पाच जिल्ह्यांत‎ कोरोनाचा प्रसार; उमरग्यात 29 रुग्ण‎

चंद्रसेन देशमुख |5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • } रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत, पण काळजी घेण्याची गरज‎

धाराशिव‎ मंुबई-पुणे, ठाणे, धाराशिव आणि वाशिम या‎ पाच जिल्ह्यांत गेल्या महिनाभरात वाढलेली‎ कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनल्याने‎ आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्याला पत्र‎ पाठवून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या‎ आहेत. रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसली तरी‎ कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने‎ टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर‎ देण्याच्या सूचना दिल्या ‎.‎ राज्यात ५ जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या‎ वाढत असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा‎ प्रादुर्भाव वाढतो की काय, अशी भीती‎ निर्माण होत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, धाराशिव‎ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांत कोरोनाचा‎ प्रादुर्भाव आढळून आला. या‎ जिल्ह्यांसाेबतच सर्वच जिल्ह्यांना आरोग्य‎ विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या‎ आहेत. रुग्णांच्या संपर्कातील प्रत्येकी २०‎ जणांच्या तपासण्या कराव्यात, असे‎ सांगण्यात आले आहे.

एकाच दिवशी १९८ रुग्णांची नोंद‎ आरोग्य संचालकांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यातील काही‎ जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना प्रादुर्भाव वाढत‎ असून हे चिंताजनक आहे. कोरोना नियंत्रणासाठी तातडीने‎ उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या चार आठवड्यांत‎ राज्यातील प्रकरणांत दुप्पट वाढ झाली. मुंबई, पुणे, ठाणे, वाशिम‎ आणि धाराशिवमध्ये सर्वाधिक पॉझिव्हिटी दर आहे. त्यामुळे‎ रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्या वाढवाव्यात.‎ त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे. लसीकरणावर भर‎ द्यावा. एक मार्च रोजी राज्यात एकाच दिवशी १९८ रुग्ण आढळले,‎ हे चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.‎ कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू‎ उमरगा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र कुणालाही गंभीर लक्षणे नाहीत.‎ त्यामुळे रुग्णांना घरातच आयसोलेट केलेले आहे. औषधांची मुबलक उपलब्धता आहे.‎ कोरोना रुग्णांसाठी गरजेनुसार स्वतंत्र विभाग तयार केले जात आहेत.‎ - डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक.‎ ‎ टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर द्यावा भर‎ अँटिजेनमध्ये निगेटिव्ह,‎ आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह‎ राज्याच्या आरोग्य संचालकांनी सर्व‎ जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणेला ८ मार्चला पत्र‎ पाठवले. त्यात सतर्क राहण्याच्या सूचना‎ दिल्या. दरम्यान, आरोग्य प्रशासनाच्या‎ सूचनेनंतर तपासण्या वाढवण्यात येत आहेत.‎ मात्र अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या‎ तपासण्या आरटीपीसीआर तपासणीत मात्र‎ पॉझिटिव्ह आढळत आहेत. उमरगा‎ तालुक्यात हे प्रकर्षाने आढळून आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...